शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

आगामी निवडणुकांतही भाजप अव्वल स्थानावरच राहील, मुख्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 19:00 IST

मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता

ऑनलाइन लोकमत शिर्डी, दि. 23 - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता कार्यकर्त्यांच्या ताकतीवर आमचा बालेकिल्ला परत खेचून आणू, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे व आगामी नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांतही आम्ही क्रमांक एकवरच राहू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिका-यांच्या शिर्डी येथील बैठ्ठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, विजयकुमार रावल, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात पंधरा वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकत भाजपा सत्तेवर आला. गेल्या दोन वर्षात राज्यातील पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाचे चिन्ह सर्वदूर पोहोचले. भाजपाच्या ताकतीवर राज्यात परिवर्तन घडणार आहे. नगरपालिका व महानगरपालिकांमध्येही राज्यात मोठे परिवर्तन घडणार असून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष असेल. भाजपासोबत जे येतील त्यांना बरोबर घेवू. अन्यथा स्वबळावर लढून अव्वल स्थान मिळवू असेही ते म्हणाले. राज्यातील जनतेने पंधरा वर्षांतील भ्रष्ट कारभार बघितला आहे. आता आमचा अडीच वर्षांचा पारदर्शक कारभार जनतेपुढे आहे. एकत्रित बसून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. नगरपालिका निवडणुका जिंकण्याची खूणगाठ प्रत्येक लोकप्रतिनिधीने बांधावी. नाशिक पदवीधर मतदार संघ भाजपासाठी अतिशय प्रतिष्ठेचा आहे. विधानसभेत बहुमत असले तरी विधानपरिषदेत बहुमत नाही. त्यामुळे चांगले निर्णय घेण्यास विलंब लागतो. त्यासाठी नाशिक पदवधीर मतदार संघात भाजपाचाच उमेदवार निवडणून आला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेही भाषण झाले. साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)---------स्थानिक निवडणुकीसाठी आघाडीचानिर्णय जिल्हा पातळीवरस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. मित्रपक्षांबरोबर आघाडी करायची की नाही यासंबंधीचा निर्णय जिल्हापातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु मित्रपक्षाव्यतिरिक्त आघाडी करण्याबाबत प्रदेशाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.