शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भाजपाने भारतीयांना दाखविलेले ‘बुरे दिन’ लवकर संपणारे नाहीत : कन्हैयाकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 20:06 IST

संपूर्ण भारतात ज्यांनी फुटकळ आश्वासने देऊन बहुमताने सत्ता मिळविली त्या सत्ताधारी पक्षाकडून माझ्यावर देशद्रोहाचे दोषारोपपत्र का दाखल केले जात नाही? असा खडा सवाल कन्हैया यांनी भाषणाच्या प्रारंभी उपस्थित केला.

ठळक मुद्देनिवडणूकीत दिलेली आश्वासने सत्तेत न पाळणारे खरे देशद्रोही५६ इंच छाती असलेले लोक माझ्यावर दोषारोपपत्र का दाखल करत नाही?मोदी यांच्याविरुध्द माझी दुश्मनी नाही मात्र वैचारिक मतभेद आहेत.असमानतेचे राजकारण मनुवादी लोक करतात.मोदी यांनी जर तीन लाख कोटींचे काळे धन परत आणले तर मग बुलेट ट्रेनसाठी जापानकडून कर्ज घेण्याची वेळ का

नाशिक : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणार्‍या भाजपने भारतीयांना दाखविलेले ‘बुरे दिन’ लवकर संपणारे नाहीत. माझ्यावर ज्यांनी देशद्रोहाचा आरोप लावला, त्यांनी सत्तेत आल्यानंतर निवडणूकीतील ‘अच्छे दिन’ व ‘विकास’ अशी दिलेली आश्वासने विसरून कोट्यवधी जनतेची दिशाभूल सत्ताधारी भाजपने केली तेच खरे देशद्रोही आहेत, असा सनसनीत टोला विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी नाशिकमध्ये आयोजित संविधान जागर सभेत लगावला. छात्रभारती, अ‍ेआयएसएफ, युवा परिषद, डीवायएफआय अशा विविध पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विद्यार्थी युवा संघटनांच्या वतीने नाशिकमधील मुंबईनाका येथील तुपसाखरे लॉन्स येथे संविधान सभा आयोजित केली होती. या सभेत ‘भारतीय विद्यार्थ्यांपुढील आव्हाने’ या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून कन्हैया कु मार बोलत होते. यावेळी व्यासपिठावर दत्ता ढगे, आयरा मालेगावकर, मिलिंद सावंत, प्रशांत निमसे, अ‍ॅड.राजपालसिंह राणा, प्रिया इंगळे, चेतन गांगुर्डे, विराज देवांग, विनय कटारे, सुवर्णा गागोडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कन्हैया म्हणाले, संपूर्ण भारतात ज्यांनी फुटकळ आश्वासने देऊन बहुमताने सत्ता मिळविली त्या सत्ताधारी पक्षाकडून माझ्यावर देशद्रोहाचे दोषारोपपत्र का दाखल केले जात नाही? असा खडा सवाल कन्हैया यांनी भाषणाच्या प्रारंभी उपस्थित केला. जनतेची दिशाभूल करणारे हे भाजपा सरकार भ्रष्टाचारी असो किंवा नसो मात्र बेईमान निश्चीतच आहे. या भाजपाने देशाला अच्छे दिन तर दाखविलेच नाही; मात्र नोटाबंदीपासून तर गॅस सबसिडीपर्यंत सर्वच स्तरावर घेतलेल्या निर्णयांच्या माध्यमातून ‘बुरे दिन’ भोगण्यास येथील गोरगरीब जनतेला भाग पाडले. देशाच्या वर्तमानातील समस्या जनतेने विसराव्या, यासाठी इतिहासामधील विविध कळीचे मुद्दे उकरून काढत त्यांच्या विपर्यास करून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न हे असमानतावादी भूमिका ठेवणारे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जे सरकार देशातील जनतेविरुध्द धोरणे आखून अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करते तेच खरे देशद्रोही आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. या देशात अन् शिवरायांच्या महाराष्टत आत्महत्त्या करण्याची वेळ ज्या शेतकर्‍यावर आली त्या शेतकर्‍याचे क र्ज माफ करण्यासाठी भाजपाकडे पैसा नाही, यापेक्षा मोठे दुर्देव या देशाचे अन् राज्याचे दुसरे कोणते असू शकेल? असा प्रश्न यावेळी कन्हैयाने उपस्थित केला.

कडेकोट बंदोबस्त अन् पोलिसांकडून अंगझडती

कन्हैया कुमार यांच्या सभेसाठी येणार्‍या प्रत्येकाची अंगझडती घेऊन पोलिसांकडून प्रवेश दिला जात होता. कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त सभेच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न येता शांततेत सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

कन्हैया यांच्या नाशिकच्या संविधान सभेतील भाषणातील मुद्दे

निवडणूकीत दिलेली आश्वासने सत्तेत न पाळणारे खरे देशद्रोही

भाजप भ्रष्टाचारी लोकांची पार्टी भाजपचे सरकार बेईमान ५६ इंच छाती असलेले लोक माझ्यावर दोषारोपपत्र का दाखल करत नाही?

वर्तमानातील समस्या जनतेने विसराव्या यासाठी इतिहास उक रला जात आहे. मोदी यांच्याविरुध्द माझी दुश्मनी नाही मात्र वैचारिक मतभेद आहेत.

मोदी यांनी जर तीन लाख कोटींचे काळे धन परत आणले तर मग बुलेट ट्रेनसाठी जापानकडून कर्ज घेण्याची वेळ का आली?

वाढत्या महागाईमुळे अच्छे दिन तर खूप लांब राहिले; मात्र ‘बुरे दिन’ देश अनुभवतोय. पीएम मोदी से सीएम मोदी तक आनंदी आनंद.

मोदी मन की बात करतील आम्ही संघर्षाची बात करु. बुरे दिन सहजासहजी संपणारे नाहीत.

ज्यांच्या पाठीवर ‘त्यांचा’ हात मग ते सर्वश्रेष्ठ श्रीमंत का होणार नाही? राजकारण पेशा होता कामा नये.

असमानतेचे राजकारण मनुवादी लोक करतात. देशाच्या एकात्मतेला बळकट करण्यासाठी संविधान बदलू पाहणार्‍या सत्ताधार्‍याना निवडणूकीत त्यांची जागा दाखवा.