शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

भाजपला प्रतीक्षा महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 13:10 IST

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

मुंबई - भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार पाडण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन करत राजकीय समिकरणेच बदलून टाकले. मात्र तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार अधिककाळ टिकनार नाही, अशीच भावना भाजप नेत्यांची आहे. आतापर्यंत भाजपच्या आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरकार लवकरच कोसळेल अशी भावना व्यक्त करून दाखवली आहे. 

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याचीच पुनरावृत्ती केली. पाटील हे पहिल्या दिवशीपासून शिवसेनेवर टीका करत आले आहे. तसेच हे अल्पअवधीचे सरकार असल्याचा पुनरोच्चार करत आहेत. हे सरकार पाडायची गरजस नसून हे आपोआपच पडले असं भाकीत त्यांनी केले आहे. तर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीतील नाराजीकडे लक्ष वेधताना सरकार कोसळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख केला होता.

मुनगंटीवार यांच्याआधी भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी देखील हे सरकार जावून राज्यात पुन्हा भाजपच सत्तारूढ होईल, असा दावा केला होता. भिन्न विचारसरणी असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं म्हटले होते. भाजपचे इतर नेतेही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार याच विचारात आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधकांना सरकार कोसळण्याचीच अधिक प्रतीक्षा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.