शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

भाजपला प्रतीक्षा महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 13:10 IST

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

मुंबई - भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार पाडण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन करत राजकीय समिकरणेच बदलून टाकले. मात्र तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार अधिककाळ टिकनार नाही, अशीच भावना भाजप नेत्यांची आहे. आतापर्यंत भाजपच्या आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरकार लवकरच कोसळेल अशी भावना व्यक्त करून दाखवली आहे. 

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याचीच पुनरावृत्ती केली. पाटील हे पहिल्या दिवशीपासून शिवसेनेवर टीका करत आले आहे. तसेच हे अल्पअवधीचे सरकार असल्याचा पुनरोच्चार करत आहेत. हे सरकार पाडायची गरजस नसून हे आपोआपच पडले असं भाकीत त्यांनी केले आहे. तर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीतील नाराजीकडे लक्ष वेधताना सरकार कोसळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख केला होता.

मुनगंटीवार यांच्याआधी भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी देखील हे सरकार जावून राज्यात पुन्हा भाजपच सत्तारूढ होईल, असा दावा केला होता. भिन्न विचारसरणी असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं म्हटले होते. भाजपचे इतर नेतेही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार याच विचारात आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधकांना सरकार कोसळण्याचीच अधिक प्रतीक्षा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.