शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विदर्भात भाजपा, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी, सोलापुरात तृतीयपंथी सरपंच; सिंधुदुर्गचा गड राणेंनी राखला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:20 IST

ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली असली अमरावती आणि चंद्रपुरात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.

मुंबई : ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली असली अमरावती आणि चंद्रपुरात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे.नागपूर जिल्ह्यातील २३६ ग्रामपंचायतींपैकी १३२ ठिकाणी जिंकल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर काँग्रेसने १४८ तर शिवसेनेने ४८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ पैकी काँग्रेसने १९ तर भाजपाने १८ ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. तीन ठिकाणी शिवसेना, प्रत्येकी दोन ठिकाणी शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टीने विजय मिळविला. एका ठिकाणी राकाँ आणि सहा ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील १६ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे. वर्धा जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. यात ५० ठिकाणी भाजपाचे वर्चस्व आहे. २६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येकी तीन ग्रामपंचायती राहिल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. गोंदियातील ७० टक्के ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात भाजपची मुसंडी मारली असून २०४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावर दावा केला आहे.पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सरशीपश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा वारु रोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या होत्या. यापैकी ४३५ ठिकाणी मतदान झाले होते. १५० ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. तर राष्ट्रवादी ७३, काँग्रेस ६८, शिवसेना ६२ तर भाजपाला ४७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यात यश मिळाले आहे. सांगलीत काँग्रेसकडे १११ तर राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. ६२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे दावा भाजपाने केला आहे. राष्ट्रवादीने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळमध्ये निराशाजनक कामगिरी तर साताºयात ११२ ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.मुख्यमंत्र्यांना असाही दणकामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री, तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपाच्या सरपंच उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले.भाजपा पुरस्कृत सरपंचसोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे भाजपा पुरस्कृत ज्ञानेश्वर कांबळे हे तृतीयपंथी सरपंच निवडून आले आहेत. विजयानंतर कांबळे यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणचे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यात ज्ञानेश्वर कांबळे यांना सर्वाधिक ८३४ मते मिळाली. त्यांनी जयसिंग साळवे (६६७ मते) यांचा पराभव केला.सिंधुदुर्गमध्ये राणेंचे वर्चस्व : कोकणात सिंधुदुर्गवर पुन्हा नारायण राणेंचेच वर्चस्व राहिले आहे. एकूण ३२५ ग्रामपंचायतींपैकी २३५ ग्रामपंचायतींवर समर्थ विकास पॅनेलने विजय संपादन केल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला, तर भाजपाने ७१ ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आणल्याचा दावा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला आहे. रत्नागिरीत २१५ पैकी ११७ सरपंच शिवसेनेचे निवडून आले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत दुस-या टप्प्यातील ३ हजार ६६६ पैकी एक हजारांवर ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला आहे.दुस-या टप्प्यातही भाजपाच क्रमांक एकवर आहे. भाजपाचे नेमके किती सरपंच आहेत हे सिद्ध करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय सरपंच मेळावा आयोजित करू.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र