शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात भाजपा, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी, सोलापुरात तृतीयपंथी सरपंच; सिंधुदुर्गचा गड राणेंनी राखला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:20 IST

ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली असली अमरावती आणि चंद्रपुरात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.

मुंबई : ग्रामपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीत विदर्भात अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली असली अमरावती आणि चंद्रपुरात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे.नागपूर जिल्ह्यातील २३६ ग्रामपंचायतींपैकी १३२ ठिकाणी जिंकल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर काँग्रेसने १४८ तर शिवसेनेने ४८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ पैकी काँग्रेसने १९ तर भाजपाने १८ ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. तीन ठिकाणी शिवसेना, प्रत्येकी दोन ठिकाणी शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टीने विजय मिळविला. एका ठिकाणी राकाँ आणि सहा ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील १६ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व सिद्ध केले आहे. वर्धा जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. यात ५० ठिकाणी भाजपाचे वर्चस्व आहे. २६ ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येकी तीन ग्रामपंचायती राहिल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. गोंदियातील ७० टक्के ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात भाजपची मुसंडी मारली असून २०४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावर दावा केला आहे.पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सरशीपश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा वारु रोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या होत्या. यापैकी ४३५ ठिकाणी मतदान झाले होते. १५० ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. तर राष्ट्रवादी ७३, काँग्रेस ६८, शिवसेना ६२ तर भाजपाला ४७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यात यश मिळाले आहे. सांगलीत काँग्रेसकडे १११ तर राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. ६२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे दावा भाजपाने केला आहे. राष्ट्रवादीने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळमध्ये निराशाजनक कामगिरी तर साताºयात ११२ ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.मुख्यमंत्र्यांना असाही दणकामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री, तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपाच्या सरपंच उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले.भाजपा पुरस्कृत सरपंचसोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे भाजपा पुरस्कृत ज्ञानेश्वर कांबळे हे तृतीयपंथी सरपंच निवडून आले आहेत. विजयानंतर कांबळे यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणचे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यात ज्ञानेश्वर कांबळे यांना सर्वाधिक ८३४ मते मिळाली. त्यांनी जयसिंग साळवे (६६७ मते) यांचा पराभव केला.सिंधुदुर्गमध्ये राणेंचे वर्चस्व : कोकणात सिंधुदुर्गवर पुन्हा नारायण राणेंचेच वर्चस्व राहिले आहे. एकूण ३२५ ग्रामपंचायतींपैकी २३५ ग्रामपंचायतींवर समर्थ विकास पॅनेलने विजय संपादन केल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला, तर भाजपाने ७१ ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आणल्याचा दावा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला आहे. रत्नागिरीत २१५ पैकी ११७ सरपंच शिवसेनेचे निवडून आले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत दुस-या टप्प्यातील ३ हजार ६६६ पैकी एक हजारांवर ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला आहे.दुस-या टप्प्यातही भाजपाच क्रमांक एकवर आहे. भाजपाचे नेमके किती सरपंच आहेत हे सिद्ध करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय सरपंच मेळावा आयोजित करू.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र