शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

"आदित्यजी, बाबरीची घटना घडली तेव्हा तुम्ही रांगत होता", आदित्य ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 11:25 IST

'बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते.

मुंबई: राज्यात हनुमान चालीसा आणि भोंगा वादानंतर आता अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे. बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यावर शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.

'...तेव्हा तुम्ही रांगत होता'आदित्य यांनी केलेल्या टीकेवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. "आयत्या पिठावर रेघोट्या" या मथळ्याखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात, "आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी, या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरुन तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य नाही. हेही स्पष्ट झालंय," अशी टीका उपाध्ये यांनी या पोस्टमधून केलीय.

'जरा आत्मपरीक्षण करा'ते पुढे म्हणतात की "बाकी राम मंदिरासाठी भाजपाने आपली उत्तर प्रदेशसह काही राज्यातील सरकारे पणाला लावली. अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा," असा सल्लाही उपाध्ये यांनी दिलाय.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅनटीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाले होते की, 1857च्या लढ्यात देवेंद्र फडणवीसांचं खूप योगदान आहे, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. तसेच आता राज्यासमोर महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे, असही आदित्य ठाकरे म्हणाले होते.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस