शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

"आदित्यजी, बाबरीची घटना घडली तेव्हा तुम्ही रांगत होता", आदित्य ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 11:25 IST

'बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते.

मुंबई: राज्यात हनुमान चालीसा आणि भोंगा वादानंतर आता अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे. बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यावर शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यावर आता भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.

'...तेव्हा तुम्ही रांगत होता'आदित्य यांनी केलेल्या टीकेवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. "आयत्या पिठावर रेघोट्या" या मथळ्याखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये उपाध्ये म्हणतात, "आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी, या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरुन तुम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य नाही. हेही स्पष्ट झालंय," अशी टीका उपाध्ये यांनी या पोस्टमधून केलीय.

'जरा आत्मपरीक्षण करा'ते पुढे म्हणतात की "बाकी राम मंदिरासाठी भाजपाने आपली उत्तर प्रदेशसह काही राज्यातील सरकारे पणाला लावली. अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा," असा सल्लाही उपाध्ये यांनी दिलाय.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅनटीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आदित्य ठाकरेंना या वादासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाले होते की, 1857च्या लढ्यात देवेंद्र फडणवीसांचं खूप योगदान आहे, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. तसेच आता राज्यासमोर महागाई, बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे, असही आदित्य ठाकरे म्हणाले होते.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस