शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे भाजपने भांडवल करू नये - राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Updated: October 10, 2016 03:01 IST

शेगाव येथील पत्रपरिषदेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप; सरकार म्हणजे केवळ ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ९- सर्जिकल स्ट्राइक्स करण्यापूर्वी भारतीय सैन्याने नियोजन केले होते. त्यामुळे ते कशासाठी खोटे बोलतील? आपण त्यांच्यावर विश्‍वास ठेवायला हवा. हा मामला सैन्य, देश आणि नागरिक यांच्याशी संबंधित आहे. मात्र, या विषयाचे भांडवल भारतीय जनता पक्ष करीत असल्याचा आरोप, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी येथे केला.काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी शेगावात आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की राज्यातील भाजप-शिवसेनेच्या शासनाची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, या सरकारपासून समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. त्यामुळे हे सरकार म्हणजे केवळ ह्यइव्हेंट मॅनेजमेंट कंपनीह्ण बनली आहे. महाराष्ट्रात २३३ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद व १0 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात येत आहे. या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसला जिंकता याव्या, यासाठी स्वराज्य संकल्प अभियानास आजपासून प्रारंभ करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगर परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभही या निमित्ताने होत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेच्या प्रस्तावनेत सांगितले. जनतेला राज्य शासनाकडून खूप अपेक्षा होत्या; मात्र हे शासन सर्वच आघाड्यांवर पूर्णत: अपयशी ठरले आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्‍वासने या सरकारने पाळलेली नसल्याने हे शासन केवळ जनतेची लूट करीत असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेची झाली आहे. कापसाला सहा हजार रुपये भाव देण्याचे आश्‍वासन पूर्ण केले नाही. येणार्‍या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील, असेही ते म्हणाले. अनेक बाबतीत न्यायालय या शासनाला फटकारत आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतरच या शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. यवतमाळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांने दुष्काळ जाहीर करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेतकरी आत्महत्या थांबत नसून, सरकारने जनमानसाचा विश्‍वास गमावल्याचे ते म्हणाले. आम्ही शासनातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो; परंतु मुख्यमंत्री फडणवीस त्यांना क्लीन चिट देतात. कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. भगवान गडावरील वादात मी पडणार नसल्याचे सांगून, गडाचे पावित्र्य राखले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकार मराठा, धनगर, मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विलंब करून, या समाजाच्या जनतेची उपेक्षा करीत आहे. ज्या ठिकाणी अतवृष्टी झाली, त्यांना मदत देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवून शेतकर्‍यांना मदत दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निश्‍चयही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दोन वर्षाच्या या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी कोणत्याही जनोपयोगी योजना राबविल्या नसून, सामजिक तेढ निर्माण करण्याचे एकमेव कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले. येणार्‍या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत जनतेच्या न्यायालयात त्याचा फैसला होणार असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस अँड. गणेश पाटील, श्याम उमाळकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते रामविजय बुरूंगले, अंजली टापरे यांची उपस्थिती होती.नाशिकच्या घटनेबाबत शांततेचे आवाहनशनिवारी नाशिक येथे पाच वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने केलेल्या पाशवी अत्याचारामुळे नाशिकसह परिसरातील जनता रस्त्यावर आली आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. येत्या १५ दिवसांत या प्रकरणाची चार्जशिट न्यायालयात दाखल करणार असल्याचे आश्‍वासन सरकारच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.