शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच सेना-भाजप वेगळे होणार - शरद पवार

By admin | Updated: May 4, 2015 14:22 IST

मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वी भाजपा-शिवसेनेची युती संपुष्टात येईले आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. ४ -  मुंबई महापालिका निवडणूकांपूर्वी भाजपा- शिवसेनेची युती संपुष्टात येईल आणि ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सत्तेत सहभागी व्यक्तींकडूनच या संभाव्य दुराव्याबद्दल माहिती मिळाल्याचे पवार म्हणाले. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी  शेतक-यांसमोरील प्रश्न, पाणीपुरवटा, आर. आर. पाटील यांचे पोलिस प्रशासनातील काम अशा विविध मुद्यांवर भाष्य केले.
 
आव्हाडांच्या मताशी मी असहमत...
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असून मी त्यांच्याशी सहमत नाही, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. इतिहास तज्ज्ञ समजले जाणा-या बाबासाहेब पुरंद-यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणावर टीका का केली नाही, असा खोचक प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी  त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल निषेध केला होता. त्यावरून वाद सुरू असतानाच पवारांनी मात्र आपण त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगत या वादात पडणे टाळले. 
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. पेट्रोलचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचेही भाव वाढले.. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारबद्दल काय वाटते असा प्रश्न पवारांना विचारला असता 'दरवाढीने लोकांना अच्छे दिन दिसू लागले आहेत' अशी खोचक टिपण्णी करत त्यांनी मोदी सरकारला टोला हाणला.