शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विधान परिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:25 IST

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेत युती झाली

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेत युती झाली. दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन जागा लढवतील. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा घोळ मात्र कायम आहे.अमरावतीत प्रवीण पोटे हे भाजपाचे उमेदवार असतील. चंद्रपूर-वर्धेतून पक्षसंघटनेत दीर्घकाळ काम करीत असलेले रामदास आंबटकर यांना भाजपाने संधी दिली आहे. लातूर-बीड-उस्मानाबादच्या उमेदवारीचा निर्णय झाला नसला तरी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.शिवसेनेने नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दराडेंनी ऐनवेळी शिवसेनेत येऊन उमेदवारी मिळविली. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेने अकोल्यातील पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव यांना आधीच उमेदवारी दिली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अ‍ॅड. राजीव साबळे यांना मैदानात उतरविले आहे.लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपा-शिवसेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तब्बल ९४ मते अधिक आहेत, पण कागदावरील गणित बिघडविण्यासाठी भाजपा प्रतिष्ठा पणाला लावेल, असे दिसते. भाजपाकडून दावेदार असणाऱ्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पक्षप्रवेश देत निवडणूक रिंगणात उतरविले. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा निर्णय न झाल्यामुळे कराड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.परभणी-हिंगोलीत युतीकडे १५० तर आघाडीकडे तब्बल २९० मते आहेत. मात्र, अकोल्यात शिवसेनेकडे जास्त मते नसूनही विधान परिषदेची निवडणूक जिंकून दाखविणारे गोपीकिशन बाजोरिया आपल्या मुलासाठी सर्व प्रकारच्या शक्कली लढवतील. बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ सुशीलकुमार देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला़आघाडीचा निर्णय नाहीकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते दिल्लीत या बाबत निर्णय घेऊन कळवतील, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर-वर्धा, अमरावती आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या तीन जागा भाजपा लढविणार असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग व परभणी-हिंगोली या तीन जागा शिवसेना लढवेल.संख्याबळाचा विचार केला तर चंद्रपूर-वर्धा, अमरावती दोन जागांवरील भाजपाचा विजय निश्चित मानला जातो. नाशिकमध्ये युती घट्ट राहिली तर शिवसेनेचा विजय पक्का असेल. कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी शिवसेनेसाठी धोक्याची ठरू शकते.