शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा तयारी सैराट

By admin | Updated: September 3, 2016 21:45 IST

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरु आहे

- मनोहर कुंभेजकर / ऑनलाइन लोकमत
बाटी चोखा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी साधला भोजपूरी भाषेत उत्तर भारतीयांशी संवाद 
 
मुंबई, दि. 3 - आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अजून सहा महिने शिल्लक असले तरी भाजपाची पालिका निवडणुकीची तयारी सध्या सैराट सुरु आहे.पालिका निवडणुकीत शिवसेना -भाजपा युती होणार नाही हे गृहीत धरुन मुंबई भाजपाने पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.सध्या पालिकेत भाजपाचे ३१ नगरसेवक असून भाजपाला एकहाती सत्ता हवी आहे.मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात षण्मुखानंद येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात पालिका निवडणुकीसाठी ११४ नगरसेवक कसे निवडून येतील याकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेऊन जोमाने कामाला लागा असे आवाहन केले होते. 
 
आता त्यासाठी सर्व जाती धर्माच्या मतदारांशी थेट संपर्क भाजपाने सुरु केला आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस हे देखिल मुंबई भाजपाच्या विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र आहे.यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यानी पश्चिम उपनगरला क्वचितच भेट दिली असेल,परंतू मुंख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी आतापर्यंत किमान १५ ते २० वेळा पश्चिम उपनगरातील भाजपाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढवला असल्याचे पश्चिम उपनगरातले चित्र आहे. 
 
मुंबईत मोठ्या प्रमाणात गुण्या गोंविदाने राहणा~या उत्तर भारतीयांना मुंबईतुन कदापी हद्दपार करणार नाही.ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मुंबई भाजपातर्फे गोरेगाव(पूर्व)येथील एनएससी संकुलात उत्तर भारतीयांसाठी आयोजित केलेल्या "बाटी चोखा संवाद कार्यक्रमात केले.मुंबईत प्रथमच उत्तर प्रदेशांत प्रसिध्द असलेल्या बाटी चोखा खात या सभेला मोठ्यासंख्येने उपस्थित असलेल्या मुंबईत राहात असलेल्या उत्तर भारतीय भोजपुरी भाषेत नागरिकांशी शेर शायरी मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधला.आणि मंचकावर उपस्थित असलेल्या सुमारे १२ भाजपाच्या उत्तर भारतीय नेत्यांची त्यांनी मंचकावर नावे देऊन त्यांना जिंकून घेतले.मुंबईत असलेल्या ४० लाख उत्तर भारतीयांनाच्या मतांवर डोळा ठेवून स्वयंबळावर पालिका निवडणूकीत विजय मिळविण्याचे रणशिंग भाजपाने फूकल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला मुंबईतील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.यामध्ये महिलांही मोठ्या प्रमाणात दिसून आल्या.कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येकाला उत्तर भारतातील गमश्या बांधण्यात आले होते. 
 
महाराष्ट आणि उत्तर प्रदेशाचे जुने नाते नाते आहे.उत्तर प्रदेशातुन आलेल्या प्रभू रामचंद्रांचे याच महाराष्टाने स्वागत केले होते आणि आजही .हीच परंपरा महाराष्टात आजही सुरूच आहे.मुंबईने देशातील अनेकांना मोठे केले.अमिताभ बच्चनही याच मुबईतून सुपरस्टार झाला असून आजही मुंबईच्या विकासासाठी धावू येत आहेत.भाषा,प्रांतवर लढले तर आमचे नुकसान होईल असा भावनिक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना-मनसेला मारला.
 
महाराष्ट्राच्या इतिसातील प्रथमच असा मुख्यमंत्री असेल की,जो मुंबईत उत्तर भारतीयांशी बाटी चोखा खात संवाद करत आहे.काॅग्रेसच्या काळात मुंबईतील उत्तर भारतीय लोकांवर सतत अत्याचार झाले.परंतु केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून मुंबईतील एकही उत्तर भारतीयांवर हल्ला झालेला नाही.यामुळे भाजपाच्या राज्यात मुंबईतील उत्तर भारतीय सुरक्षित आहे.मुंबई महापालिकेत भाजपाला एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे.यामुळै तुमच्या सर्वांची साथ हवी आहे असे आवाहन करत मुंबई भाजपा अध्यक्ष -आमदार श्री.आशिष शेलार यांनी उत्तर भारतीयांना मुंबई महापालिकैची निवडणूक डोळ्यासमौर ठेवूनच प्रत्येक मुद्याला हात घातला.उत्तर प्रदेशांतून १८००ते १९०० किलो मीटरपासून दुर खेड्यातुन आलेल्या उत्तर भारतीयांनी मुंबईत महत्वाचे योगदान दिले.यावेळी खासदार गोपाळ शेट्टी,मुंबई भाजपा अध्यक्ष -आमदार आशिष शेलार,महिला बालविकास राज्य मंत्री विद्या ठाकूर,आमदार भाई गिरकर,मुंबई भाजपा सरचिटणीस अमरजित मिश्र,उत्तर भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कुंभोज,प्रेम शुक्ला आदीं मान्यवर उपस्थिती होते.