शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
9
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
10
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
11
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
12
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
13
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
14
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
15
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
16
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
17
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
18
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
19
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
20
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!

युतीसाठी भाजपाचा शिवसेनेला प्रस्ताव

By admin | Updated: January 18, 2017 03:57 IST

भाजपाच्या बालेकिल्ल्यात मेळावे घेण्यास सुरूवात केल्याने अखेर भाजपाने शिवसेनेला अधिकृतपणे युतीचा प्रस्ताव पाठवला.

सदानंद नाईक,

उल्हासनगर- रिपाइंशी परस्पर युती केल्याने नाराज असलेल्या शिवसेनेने उल्हासनगर पालिकेत महायुती अशक्य असल्याचे सांगितल्याने आणि भाजपाच्या बालेकिल्ल्यात मेळावे घेण्यास सुरूवात केल्याने अखेर भाजपाने शिवसेनेला अधिकृतपणे युतीचा प्रस्ताव पाठवला. मात्र जागावाटपावरून असलेला तिढा, अन्य पक्षांच्या अपेक्षांमुळे युतीच्या चर्चेची केवळ औपचारिकता पार पाडली जाईल. प्रत्यक्षात दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील, असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खासगीत मान्य केले. साई पक्षाने सत्तेत सहभागी होताना दिलेली आश्वासने न पाळल्याने शिवसेना-भाजपाचे संबंध धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने साई पक्षाच्या सहभागास शिवसेनेचा विरोध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या महायुतीत साई पक्ष असण्याबाबतही संभ्रम कायम आहे.युती तुटल्याचे खापर आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून भाजपाने ही खेळी खेळली आहे. जागावाटपाचे, मित्रपक्षांना सहभागाचे, आपापल्या फॉर्म्युल्याचे गुऱ्हाळ पुढील आठवडाभरात सुरू राहील. त्याला दोन-तीन दिवसात सुरूवात होईल, असे या नेत्यांनी सांगितले. भाजपाचे निवडणूक प्रभारी दिगंबर विशे यांनी युतीची चर्चा होऊन शांततेत जागावाटप पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. उल्हासनगरात भाजप-शिवसेना व रिपाइं हे नैसर्गिक मित्रपक्ष असून पालिकेवर या युतीची सत्ता येईल. काही कारणास्तव युतीची बोलणी थांबली असली, तरी दोन-तीन दिवसात पुन्हा चर्चा होऊन जागावाटप केले जाईल, असे ते म्हणाले. अर्थात मुंबईच्या निर्णयावर येथील युतीचा निर्णय अवलंबून असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भाजपाच्या एका नेत्याकडून युतीच्या बोलण्यांसाठी फोन आल्याचे सांगितले. मात्र महायुतीत स्थानिक साई पक्ष असणार की नाही, याबाबत शिवसेना-भाजपा कोणीही स्पष्टपणे सांगण्यास तयार नाही. (प्रतिनिधी)>भाजपा-रिपाइंची युती ही नैसर्गिकचभाजप व रिपाइंत नैसर्गिक युती असल्याने त्यांच्यात आधी जागावाटप झाले. महापालिकेची सत्ता काबीज करायची असेल, तर शिवसेना-भाजपाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असा सूर विशे यांनी लावला. यापूर्वी दोन्ही पक्षाच्या जागावाटपाच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन-तीन दिवसांत बोलणी होऊन जागावाटप केले जाईल, असे ते म्हणाले.