शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

युतीसाठी भाजपावर दिल्लीतून दबाव?

By admin | Updated: January 25, 2017 03:08 IST

नोटबंदीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला अपयश आले, तर उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल.

अतुल कुलकर्णी / मुंबईनोटबंदीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला अपयश आले, तर उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल. तो होऊ नये, म्हणून कोणत्याही स्थितीत शिवसेनेसोबत युती करा, असा दबाव केंद्रीय नेतृत्वाने राज्यातल्या नेत्यांवर टाकल्याने भाजपाची भाषा मवाळ झाली आहे. भाजपाने मुंबईत केलेल्या सर्वेक्षणातही शिवसेना आघाडीवर राहील, अशी माहिती आहे.गेली दोन वर्षे भाजपाकडून शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक मिळाली. त्यामुळे सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावण्याचे काम शिवसेनेने केले. नोटाबंदीनंतर मुंबईच्या आर्थिक जगतात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांसह गुजराती समाजाचे व्यापारीही भाजपाच्या विरोधात गेल्याची माहिती वरिष्ठ पातळीवर मिळाली आहे. गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका ४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहेत, पण सगळ्यांचे निकाल हे मार्च महिन्यात जाहीर होणार आहेत. मात्र, मुंबई पालिकेचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात उत्तर प्रदेशात चार टप्प्यांत मतदान होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत जर भाजपाला अपयश आले, तर त्याचा वाईट परिणाम त्या चार टप्प्यांवर होईल, अशी भीती भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वास वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शिवसेनेसोबत युती करा, असे सुचवले गेल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. जर युती झाली नाही आणि निकालानंतर शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर सरकारपुढील डोकेदुखीतही वाढ होईल. आजपर्यंत शिवसेनेवर भाजपाने जो दबाव निर्माण करून ठेवला होता, त्यालाही तडा जाईल. दुसरीकडे शिवसेना जर स्वतंत्र लढली, तर किमान ९५ ते ११० जागा जिंकू शकेल, असे पक्षाचे सर्वेक्षण सांगत आहे.