शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Tauktae Cyclone: मच्छीमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही: दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:36 IST

Tauktae Cyclone: आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानीची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: तोक्ते चक्रीवादळामुळे मालाड पश्चिम मढ कोळीवाड्यातील  बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. येथील आपदग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी आर्थिक मदतीचा धनादेश व धान्यवाटप करून दिलासा दिला.

दि. २८ मे रोजी आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी तेथील मच्छिमार बांधवांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. हरबादेवी मंदिराच्या या पटांगणात काल सायंकाळी झालेल्या वाटप कार्यक्रमात आमदार रमेश पाटील यांच्यावतीने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व माजी मंत्री माननीय विजय गिरकर यांच्या हस्ते बोट मालकांना धनादेश व अन्न धान्य वाटप करण्यात आले.

सरकारने मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना मच्छिमारांना अपुरी मदत करून मच्छिमारांना निराश करून सरकारने मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ४० ते ५० लाख रुपये किमतीच्या बोट मालकांना २० ते २५ हजारांची मदत करून कोळी समाजाची सरकारने चेष्टा केली आहे, असा आरोप आमदार रमेश पाटील यांनी केला.

मच्छिमार बांधवांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले, त्याप्रमाणे मढ कोळीवाडा येथील नुकसान झालेल्या सर्व बोट धारकांना आर्थिक सहाय्य करून मच्छीमार बांधवांना धान्य वाटप केले अशी माहिती त्यांनी दिली. 

यावेळी  विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ज्या बोट मालकाच्या बोटीचे नुकसान झालेले आहे अशा बोट मालकांना मुंबई जिल्हा बँकेकडून बिनव्याजी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल व मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी मच्छीमार बांधवांना सांगितले. तसेच मच्छीमारांचा डिझेल परतावा सरकारने ठराविक दिवसात मच्छिमारांना देण्याबाबत कायदा बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. मच्छीमार बांधवांना सरकारने मदत केली नाही किंवा मच्छिमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा सरकारला इशारा त्यांनी दिला.  राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री या विभागाचे प्रतिनिधी असताना त्यांनी मच्छीमारांना योग्य मदत जाहीर करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी कोणतीही मदत जाहीर केली नसल्याचे सांगून मी मंत्री असतो तर प्रत्येक मच्छीमाराला एक लाख रुपये मदत जाहीर केली असती, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

विजय गिरकर यांनी मच्छिमारांना सरकारने तुटपुंजी मदत न करता योग्य मदत केली पाहिजे व ही मदत मिळविण्यासाठी आम्ही सभागृहात सरकारला धारेवर धरू, असे सांगून आमदार रमेश पाटील यांनी मच्छिमारांना जी मदत केली याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, मच्छिमार नेते किरण कोळी, राजेश्री भानजी, महाराष्ट्र भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष अँड.चेतन पाटील तसेच भाजपा व कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी व मढ ग्रामस्थ व कोळी महिला उपस्थित होते.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMumbaiमुंबई