शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

By admin | Updated: July 20, 2014 01:11 IST

अगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष

जिल्हा परिषद : अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी गणेश हूड - नागपूरअगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप-शिवसेना युतीत लढत होणार आहे. यासाठी दोन्हीकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. जि.प.तील भाजप-शिवसेनेसोबत असलेली आघाडी संपुष्टात आणा, असे पत्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कमिटीला पाठविले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला, विषय समित्यांच्या सभापतींचा २ आॅक्टोबरला तर पंचायत समिती सभापतींची मदत १४ सप्टेंबरला संपत आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.केंद्रात भाजपची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, अशी हवा आहे. अशा परिस्थितीत जि.प.तील सत्ता टिकविण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये, यासाठी भाजप-शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली आहे. परंतु हा पक्षांतर बंदीचा कायदा राष्ट्रीय पक्षांनाच लागू होत असल्याने, याचा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सदस्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जाणकाराचे मत आहे. तसेच अध्यक्षपद मिळाले नाही तर भाजप-शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत चमत्कार होणार असल्याची चर्चा आहे. जि.प.तील ५९ सदस्यांत बसपा, गोगपा व आरपीआय पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या सदस्यांच्या भूमिकेवर सत्ता समीकरण अवलंबून आहे. सध्या सत्ताधारी आघाडीकडे भाजप २२, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७ व गोगपा १ असे ३८ चे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर ही संख्या ३१ होणार आहे. परंतु अध्यक्षपदाचे दावेदार अनेक असल्याने बंडखोरांची संख्याही मोठी आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदावरून भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजपच्या निशा सावरकर व शिवसेनेच्या भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुणा रमेश मानकर व निशा टेकचंद सावरकर व शुभांगी गायधने यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसचा उमेदवार वेळेवर होणाऱ्या समीकरणानुसार ठरणार असल्याचे समजते.