शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

By admin | Updated: July 20, 2014 01:11 IST

अगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष

जिल्हा परिषद : अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी गणेश हूड - नागपूरअगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप-शिवसेना युतीत लढत होणार आहे. यासाठी दोन्हीकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. जि.प.तील भाजप-शिवसेनेसोबत असलेली आघाडी संपुष्टात आणा, असे पत्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कमिटीला पाठविले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला, विषय समित्यांच्या सभापतींचा २ आॅक्टोबरला तर पंचायत समिती सभापतींची मदत १४ सप्टेंबरला संपत आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.केंद्रात भाजपची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, अशी हवा आहे. अशा परिस्थितीत जि.प.तील सत्ता टिकविण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये, यासाठी भाजप-शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली आहे. परंतु हा पक्षांतर बंदीचा कायदा राष्ट्रीय पक्षांनाच लागू होत असल्याने, याचा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सदस्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जाणकाराचे मत आहे. तसेच अध्यक्षपद मिळाले नाही तर भाजप-शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत चमत्कार होणार असल्याची चर्चा आहे. जि.प.तील ५९ सदस्यांत बसपा, गोगपा व आरपीआय पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या सदस्यांच्या भूमिकेवर सत्ता समीकरण अवलंबून आहे. सध्या सत्ताधारी आघाडीकडे भाजप २२, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७ व गोगपा १ असे ३८ चे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर ही संख्या ३१ होणार आहे. परंतु अध्यक्षपदाचे दावेदार अनेक असल्याने बंडखोरांची संख्याही मोठी आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदावरून भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजपच्या निशा सावरकर व शिवसेनेच्या भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुणा रमेश मानकर व निशा टेकचंद सावरकर व शुभांगी गायधने यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसचा उमेदवार वेळेवर होणाऱ्या समीकरणानुसार ठरणार असल्याचे समजते.