शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

By admin | Updated: July 20, 2014 01:11 IST

अगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष

जिल्हा परिषद : अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी गणेश हूड - नागपूरअगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप-शिवसेना युतीत लढत होणार आहे. यासाठी दोन्हीकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. जि.प.तील भाजप-शिवसेनेसोबत असलेली आघाडी संपुष्टात आणा, असे पत्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कमिटीला पाठविले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला, विषय समित्यांच्या सभापतींचा २ आॅक्टोबरला तर पंचायत समिती सभापतींची मदत १४ सप्टेंबरला संपत आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.केंद्रात भाजपची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, अशी हवा आहे. अशा परिस्थितीत जि.प.तील सत्ता टिकविण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये, यासाठी भाजप-शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली आहे. परंतु हा पक्षांतर बंदीचा कायदा राष्ट्रीय पक्षांनाच लागू होत असल्याने, याचा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सदस्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जाणकाराचे मत आहे. तसेच अध्यक्षपद मिळाले नाही तर भाजप-शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत चमत्कार होणार असल्याची चर्चा आहे. जि.प.तील ५९ सदस्यांत बसपा, गोगपा व आरपीआय पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या सदस्यांच्या भूमिकेवर सत्ता समीकरण अवलंबून आहे. सध्या सत्ताधारी आघाडीकडे भाजप २२, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७ व गोगपा १ असे ३८ चे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर ही संख्या ३१ होणार आहे. परंतु अध्यक्षपदाचे दावेदार अनेक असल्याने बंडखोरांची संख्याही मोठी आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदावरून भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजपच्या निशा सावरकर व शिवसेनेच्या भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुणा रमेश मानकर व निशा टेकचंद सावरकर व शुभांगी गायधने यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसचा उमेदवार वेळेवर होणाऱ्या समीकरणानुसार ठरणार असल्याचे समजते.