शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

राज्यमंत्र्याच्या हट्टापायी भाजपाची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत

By admin | Updated: October 2, 2016 01:35 IST

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी आता मुंबईत ५ आणि ६ आॅक्टोबरला होणार असून गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हट्टापायी

- यदु जोशी, मुंबईभाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी आता मुंबईत ५ आणि ६ आॅक्टोबरला होणार असून गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हट्टापायी हा बदल करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. डॉ. पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आहेत. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. त्यामुळे या कार्यकारिणी बैठकीचा पाटील यांच्या निवडणुकीला फायदाच झाला असता. तथापि, निवडणूक आयोगाने मतदारयाद्या नव्याने तयार करूनच ही निवडणूक घ्यावी, असे फर्मान काढले. त्यामुळे ही निवडणूक आता जानेवारी वा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. असे असले तरी नवीन मतदार नोंदणी करवून घेण्याची नवीनच डोकेदुखी भाजपासह सर्व पक्षांना लागली आहे. १ आॅक्टोबरपासून एक महिना ही नोंदणी करावी लागणार आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ५ आणि ६ तारखेला अमरावतीमध्ये झाली तर मतदारनोंदणीची जबाबदारी असलेले अनेक कार्यकर्ते कार्यकारिणी बैठकीच्या तयारीमध्ये अडकून पडले असते. त्यामुळे बैठकीचे स्थळ बदलण्याची मागणी पुढे आली. सूत्रांनी सांगितले की, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटले आणि स्थळ बदलण्याची मागणी केली. ती मान्य झाली असून आता बैठक मुंबईला होणार आहे. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की मुंबईत बैठक घेतली म्हणजे दिल्लीतील नेत्यांना बैठकीसाठी येणे सोपे जाते हे कारण असू शकते. खा. रावसाहेब दानवे हे कोरियाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भाऊसाहेब फुंडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मतदार नोंदणी निकडीची आहे. कार्यकारिणी बैठकीच्या तयारीमध्ये कार्यकर्ते अडकून पडले असते. नंतर दसरा, दिवाळी समोर आहे. म्हणून आम्ही आग्रह धरला. राज्यमंत्री डॉ. पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले अमरावतीबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता. मुंबईत बैठक घेण्याचा निर्णय पक्ष पातळीवर झाला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रदेशाची बैठक ५ व ६ तारखेस दादरमधील मुंबई भाजपाच्या, ‘वसंत स्मृती’ कार्यालयाच्या सभागृहात होईल, असे सांगितले.अमरावतीच्या बैठकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. एका मोठ्या हॉटेलमधील ८० रुम्स बूक करण्यात आल्या होत्या. बाहेरच्या १०० खोल्याही बूक झाल्या होत्या. तसेच, चमचमीत भोजनाचे काँट्रॅक्टदेखील देण्यात आले होते. बूकिंग रद्द झाल्याचे संबंधितांना सांगताना स्थानिक आयोजकांची कसरत होत आहे.संधी गमावली : अमरावती भाजपामध्ये प्रचंड भांडणे आहेत. पालकमंत्री, स्थानिक आमदारांमधील संघर्ष लपून राहिलेला नाही. दहा नेत्यांची तोंडे दहा दिशेला आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन चांगला संदेश गेला असता पण, ती संधीदेखील हातची गेली. अमरावती विभागात भाजपाचे चार मंत्री असताना बैठकीची संधी टाळण्यात आल्याबाबत उलटसुलट चर्चा आहे.