शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणार

By admin | Updated: February 16, 2017 18:33 IST

भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणार

भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणारसोलापूर : सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनीच्या पाण्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याने आजही शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा वचननामा जाहीर कार्यक्रमानिमित्त सुभद्रा मंगल कार्यालय येथे रघुनाथ कुलकर्णी बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, आंध्रप्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस के. नीलकंठ,विश्वनाथ बेंद्रे, मल्लेशाप्पा कावळे, रामचंद्र जन्नू, बाशा शेख, प्रभाकर जामगुंडे, दत्तात्रय गणपा, मोहन डांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रघुनाथ कुलकर्णी म्हणाले की, मागील काळातील पाणी समस्या पाहिली तर भविष्यात ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेचा उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी योजना आखल्या जाणार आहेत. शहराचा सर्व्हे करून उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यावर भर असणार आहे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महापालिकेचा सर्व कारभार हा आॅनलाईन केला जाईल. मनपाच्या अर्थसहाय्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहोत. शहराचा सर्वांगीण विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास आहे असे यावेळी रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. पारदर्शक व स्वावलंबी कारभार, शुद्ध आणि विपुल पाणीपुरवठा, हिप्परगा तलावामार्फत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व सांडपाणी पुनर्वापर योजना, अग्निशामक दल, रस्ते, कचरामुक्त सोलापूर- हरित सोलापूर, भाजी मंडई, स्वच्छतागृहे, पर्यटन विकास, वस्तूसंग्रहालय, सांस्कृतिक विकास, महापौर निधीची निर्मिती, मैदाने आणि क्रीडांगणे व उद्याने, निरोगी सोलापूर, रुग्णसेवा, परिवहन सेवा, बसस्थानक आणि आधुनिक बसपोर्ट, स्मशानभूमी सुधारणा, व्यापार संकुले, शिक्षण, बचत गट आणि महिला कल्याण आदी विविध विकासकामे करण्याचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. ------------------------जनता एकहाती सत्ता देणारसोलापूरची जनता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली आहे. जनतेला बदल हवा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने स्वीकारले आहे. भारतीय जनता पार्टीचा वचननामाच खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकासनामा ठरेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.