शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणार

By admin | Updated: February 16, 2017 18:33 IST

भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणार

भाजपाचा जाहीरनामा : शहराला दररोज पाणीपुरवठा करणारसोलापूर : सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनीच्या पाण्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याने आजही शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा वचननामा जाहीर कार्यक्रमानिमित्त सुभद्रा मंगल कार्यालय येथे रघुनाथ कुलकर्णी बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, आंध्रप्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस के. नीलकंठ,विश्वनाथ बेंद्रे, मल्लेशाप्पा कावळे, रामचंद्र जन्नू, बाशा शेख, प्रभाकर जामगुंडे, दत्तात्रय गणपा, मोहन डांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रघुनाथ कुलकर्णी म्हणाले की, मागील काळातील पाणी समस्या पाहिली तर भविष्यात ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिकेचा उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी योजना आखल्या जाणार आहेत. शहराचा सर्व्हे करून उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यावर भर असणार आहे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महापालिकेचा सर्व कारभार हा आॅनलाईन केला जाईल. मनपाच्या अर्थसहाय्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहोत. शहराचा सर्वांगीण विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास आहे असे यावेळी रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. पारदर्शक व स्वावलंबी कारभार, शुद्ध आणि विपुल पाणीपुरवठा, हिप्परगा तलावामार्फत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व सांडपाणी पुनर्वापर योजना, अग्निशामक दल, रस्ते, कचरामुक्त सोलापूर- हरित सोलापूर, भाजी मंडई, स्वच्छतागृहे, पर्यटन विकास, वस्तूसंग्रहालय, सांस्कृतिक विकास, महापौर निधीची निर्मिती, मैदाने आणि क्रीडांगणे व उद्याने, निरोगी सोलापूर, रुग्णसेवा, परिवहन सेवा, बसस्थानक आणि आधुनिक बसपोर्ट, स्मशानभूमी सुधारणा, व्यापार संकुले, शिक्षण, बचत गट आणि महिला कल्याण आदी विविध विकासकामे करण्याचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. ------------------------जनता एकहाती सत्ता देणारसोलापूरची जनता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली आहे. जनतेला बदल हवा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाने स्वीकारले आहे. भारतीय जनता पार्टीचा वचननामाच खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकासनामा ठरेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला.