शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:33 IST

जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

जालना : शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. त्यांनतर तीन चाकी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा याच मुद्यावरून ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नेहमीप्रमाणे रावसाहेब दानवेंनी चांगली फटकेबाजी केली. तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला.

तर तुमचा सारा खेळ खेळून घ्या. आम्ही तुमच्यासमोर अडथळे निर्माण करणार नाही. मात्र फक्त तुमच्यातचं अडथळे होवू देवू नका, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.

तसेच चित्रपट, राजकारण आणि क्रिकेटमध्ये आपल्याला संधी मिळावी असे सर्वांचं वाटत असते. मात्र चित्रपटात रिटेक करता येतो तर क्रिकेटमध्ये सुद्धा सराव करता येतो. पण राजकारणात असे होत नसते .कारण येथे जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.