शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जवखेडला जाण्यासाठी भाजपाकडे वेळ नाही!

By admin | Updated: November 2, 2014 01:40 IST

अहमदनगर जिलतील जवखेडा येथे भीषण दलित हत्याकांड घडले. एकाच कुटुंबातील तिघांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली.

मुंबई : अहमदनगर जिलतील जवखेडा येथे भीषण दलित हत्याकांड घडले. एकाच कुटुंबातील तिघांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती, परंतु राज्यपालांनी या कुटुंबाला भेटून धीर देण्याची तसदी घेतली नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही जवखेडाला भेट देण्यासाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. या प्रकारामुळे राज्यात वेगळा संदेश जात आहे, असा आरोप करीत हत्याकांडाच्या आरोपींना तात्काळ अटक न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी गांधी भवनमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. 
प्रतिकूल निसगार्मुळे राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतक:यांची नड लक्षात घेता व्यापा:यांनी कवडीमोल भावात कापूस खरेदी सुरू केली आहे. नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून तातडीने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  ते म्हणाले, अपु:या  पावसामुळे यंदा अनेक जिलंमध्ये सोयाबीनचे पीक आलेच नाही, तर धान उत्पादक पट्टयात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे या दोन्ही पिकांचे उत्पादन करणारे शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. या शेतक:यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. शेतक:यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयांना नवीन राज्य सरकारने बदलू नये. अन्यथा काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यात सर्वत्र डेंग्युची साथ सुरू असून, यासंदर्भात राज्य सरकारने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या. राज्य सरकारच्या विधायक कामांना काँग्रेस पक्ष सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या सेवाहमी विधेयकाबाबत ते म्हणाले की, डिसेंबर 2क्11 मध्ये काँग्रेसने केंद्रात हेच विधेयक आणले होते. निश्चित कालावधीत सेवेची 
हमी देण्यासंदर्भात विधेयक आणण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच मांडली आहे. नव्या विधेयकाला तपासून ते जनतेच्या आशा-अपेक्षांना पूर्ण करणारे असल्यास त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष राज्य सरकारला सहकार्य करेल.   (प्रतिनिधी)