शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जिल्हाध्यक्षांकडून फसवणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 03:13 IST

दुसऱ्या पत्नीच्या मदतीने व्यावसायिक गाळा विक्री करण्यासाठी बोगस दस्ताऐवज आणि पहिल्या पत्नीचे मृत्यूचे खोटे दाखले सादर केले

वसई : वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्या पत्नीच्या मदतीने व्यावसायिक गाळा विक्री करण्यासाठी बोगस दस्ताऐवज आणि पहिल्या पत्नीचे मृत्यूचे खोटे दाखले सादर केले असून, याप्रकरणात महापालिका आणि दुय्यम उपनिबंधकही सहभागी झाले आहेत. तसेच सरकारचा लाखो रुपयांचा महसूलही बुडवल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केली आहे.मौजे आचोळे, नालासोपारा पुर्व सर्वे.क्र.१४६ या मिळकतीवरील अंबिका अपार्टमेंट या इमारतीतील गाळा क्र.९ सुवर्णा सुभाष साटम यांच्या मालकीचा होता. सुवर्णा साटम यांचे २८ एप्रिल २००३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पती आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष वसंतराव साटम यांनी हा गाळा रामभाऊ म्हाळगी पतसंस्थेला सन २००६ मध्ये विकला. त्यावेळी त्यांच्या मयत पत्नीच्या जागी दुसऱ्या पत्नीला सुवर्णा साटम म्हणून ऊभे करून सुभाष साटम यांनी दस्त नोंदणी केली. त्यांच्या दुसऱ्या पत्नी अर्पिता साटम यांनी सुवर्णा साटम यांच्या नावाने सह्याही केल्या. मयत पत्नीला जिवित दाखवून हा व्यवहार करतांना साटम यांनी शासनाचीही आर्थीक फसवणूक केल्याचेही म्हटले आहे.हा गाळा पतसंस्थेला विक्री करण्याचे ३१ आॅगस्ट २००४ ला ठरवण्यात आले होते. त्यावेळी या गाळ्याचे शासकिय मूल्यांकन ३४ लाख २७ हजार इतके करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी या गाळ्याची विक्री करण्यात आली. त्यावेळी शासकिय मूल्यांकन वाढले असताना मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी गाळ्याची किंमत ३ लाख ६५ हजार ६४० इतकी दाखवण्यात आली. काय म्हटले आहे, या तक्रारीतशासनाचा किमान दोन लाख रुपयांचा महसुल बुडवण्यात आला आहे. तर ३४ लाखांचा गाळा ३ लाखांना विक्री केल्याचे दाखवून साटम यांनी ३० लाख रुपयांचा अपहारही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही लबाडी उघडकिस येवू नये यासाठी त्यांनी राजकिय ताकदीचा वापर करून पत्नी सन २०११ मध्ये मयत झाल्याचे प्रमाणपत्र तयार केले. विशेष म्हणजे साटम यांनी २००८ साली पत्नी मयत झाल्यानंतर मृत्यु प्रमाणपत्रही घेतलेले होते. पोलीसांत तक्रार करण्यात आल्याचे मला समजले आहे. हे प्रकरण खोटे आहे. बघू या काय होते ते, असे सुभाष साटम यांनी लोकमतला सांगितले.