शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ला भाजपाची जाणीवपूर्वक शक्ती - पवार

By admin | Updated: February 9, 2015 06:11 IST

‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत

पुणे : ‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत असून, देशाच्या ऐक्याला सुरूंग लागणार आहे. हे ध्यानी घेऊन मुस्लीम समाजालाबरोबर घेऊन त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.राष्ट्रवादी प्रतिनिधी संमेलनाच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, व अन्य नेते उपस्थित होते. ‘एमआयएम’ ही हैदराबादमधील एक संघटना आहे. मात्र, नांदेडमध्ये यश मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्रात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम तरुण त्याकडे आकर्षित होत आहेत. हा काळ आव्हानात्मक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी संरक्षणमंत्री असताना बाबरी मशिदीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही संघटनांनी केला होता, असे नमूद करतानाच, भाजपाकडून आताही घरवापसी, नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण व शैक्षणिक अभ्यासक्रमांचे भगवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसची पोकळी भरून काढा !विरोधक म्हणून आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस कमी पडत आहे. दिल्लीच्या निवडणुकीतही काँग्रेस कमजोर दिसत आहे. त्यामुळे ही पोकळी राष्ट्रवादीने भरून काढावी; याला महाराष्ट्रातून सुरवात केली पाहिजे, असे पवार म्हणाले. आपण सत्तेत नसून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडून इतिहास घडविण्याचे पाईक होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी लागावे, असे आवाहन पवार यांनी केले.मोदी यांचा थेट उल्लेख टाळला येत्या १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची बारमती येथे भेट होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीची उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण भाजपा आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले.या संमेलनातही राष्ट्रवादीतील अनेक माजी मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर थेट टीका केली. त्यामुळे समारोपाच्या भाषणात त्याविषयी पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. तब्बल एक तास दोन मिनिटांच्या भाषणात पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. परंतु, मोदी यांच्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही.