शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘एमआयएम’ला भाजपाची जाणीवपूर्वक शक्ती - पवार

By admin | Updated: February 9, 2015 06:11 IST

‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत

पुणे : ‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत असून, देशाच्या ऐक्याला सुरूंग लागणार आहे. हे ध्यानी घेऊन मुस्लीम समाजालाबरोबर घेऊन त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.राष्ट्रवादी प्रतिनिधी संमेलनाच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, व अन्य नेते उपस्थित होते. ‘एमआयएम’ ही हैदराबादमधील एक संघटना आहे. मात्र, नांदेडमध्ये यश मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्रात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम तरुण त्याकडे आकर्षित होत आहेत. हा काळ आव्हानात्मक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी संरक्षणमंत्री असताना बाबरी मशिदीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही संघटनांनी केला होता, असे नमूद करतानाच, भाजपाकडून आताही घरवापसी, नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण व शैक्षणिक अभ्यासक्रमांचे भगवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसची पोकळी भरून काढा !विरोधक म्हणून आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस कमी पडत आहे. दिल्लीच्या निवडणुकीतही काँग्रेस कमजोर दिसत आहे. त्यामुळे ही पोकळी राष्ट्रवादीने भरून काढावी; याला महाराष्ट्रातून सुरवात केली पाहिजे, असे पवार म्हणाले. आपण सत्तेत नसून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडून इतिहास घडविण्याचे पाईक होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी लागावे, असे आवाहन पवार यांनी केले.मोदी यांचा थेट उल्लेख टाळला येत्या १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची बारमती येथे भेट होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीची उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण भाजपा आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले.या संमेलनातही राष्ट्रवादीतील अनेक माजी मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर थेट टीका केली. त्यामुळे समारोपाच्या भाषणात त्याविषयी पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. तब्बल एक तास दोन मिनिटांच्या भाषणात पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. परंतु, मोदी यांच्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही.