शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपाचा पराभव, अशोक चव्हाण यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:06 IST

समविचारी पक्ष एकत्र आल्यामुळे देशभर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे

मुंबई : समविचारी पक्ष एकत्र आल्यामुळे देशभर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. सर्व पक्ष एकवटल्यामुळे भाजपाचा पराभव झाला असून, दोन जागा वगळता भाजपाची सगळीकडे पिछेहाट झाली आहे. पालघर निवडणूक समविचारी पक्षांनी एकत्र लढविली असती तर तिथेही भाजपाचा पराभव करता आला असता, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगितले.पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, सर्व पक्ष एकवटल्याने भाजपाचा पराभव झाला. भंडारा गोंदिया निवडणूक एकत्रित लढल्याने जिंकता आली. पालघरमध्ये मात्र मतांचे विभाजन झाले म्हणून दामू शिंगडा यांचा पराभव झाला. पुढील निवडणुकीत सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवू. पालघरमधील भाजपाचा विजय हा गौडबंगाल करून झाला आहे. भंडारा-गोंदियात फेरमतदान झाले; मात्र पालघरमध्ये फेरमतदान करू दिले नाही. या दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगाने वेगळा न्याय का लावला? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.उद्धव ठाकरे यांनी पालघर निकालानंतर भाजपावर टीका करण्यापेक्षा काही स्वाभिमान शिल्लक असल्यास सत्तेतून बाहेर पडावे. निकालानंतरच्या पत्रपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी तांत्रिक गोष्टींवर भर दिला. शिवसेना केवळ टीका करते, ठोस भूमिका घेत नाही. लोकांना फसविण्याचा प्रकार शिवसेनेने थांबवावा, असेही चव्हाण म्हणाले.