शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 20, 2016 11:38 IST

विधानसभेचा निकाल म्हणजे भाजपचा देशभरात विस्तार होत असल्याचे निदर्शक आहेत असे बहुतांश वर्तमानपत्रांचे मत आहे. पण शिवसेनेला तसे वाटत नाही.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना पत्रकार, राजकीय विश्लेषक भाजपचे कौतुक करत आहेत. आसाममध्ये सत्ता मिळवणा-या भाजपने केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात चंचू प्रवेश केला आहे. हे निकाल म्हणजे भाजपचा देशभरात विस्तार होत असल्याचे निदर्शक आहेत असे बहुतांश वर्तमानपत्रांचे मत आहे. 
पण शिवसेनेला तसे वाटत नाही. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या पाच राज्यातील कामगिरीवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. 
 
आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला आहे, पण तामीळनाडूत जयललितांचा, प. बंगालात ममतांचा व केरळात डाव्यांचा पराभव भाजप करू शकला नाही. पुद्दुचेरीत काँग्रेसचा विजय झाला आहे. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे. आसाम व केरळात काँग्रेसची सत्ता होती. ही राज्ये काँग्रेसने गमावली आहेत. काँग्रेसचा धुव्वा उडाला असे विश्‍लेषण होत आहे. मग आसाम वगळता इतर चार राज्यांत भाजपच्या बाबतीत काय झाले? असे सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
- प. बंगालात भाजपने खाते उघडले यावरच समाधान मानायचे होते तर त्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व संपूर्ण भाजप सरकारने प्रतिष्ठा पणास लावायची कारण नव्हते. केरळात आलटून पालटून सत्ताबद्दल होत असतो. कधी काँग्रेस तर कधी डावे असा आलटून पालटून खेळ सुरू असतो. त्या परंपरेने काँग्रेस गेली व डावे अवतरले. येथेही भाजपने जोर लावला, पण खाते उघडले हेच त्यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ म्हणावे लागतील. 
- तामीळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक पक्षाने सत्ता राखली, पण द्रमुकने येथे जोरदार टक्कर दिली. द्रमुक ३२ जागांवरून १०५ जागांपर्यंत पोहोचली. जयललितांना १२६ जागा मिळाल्या. ९२ वर्षांच्या करुणानिधींनी ‘‘ही शेवटची निवडणूक’’ म्हणून भावनिक आवाहन केले, पण तामीळनाडूतील जनतेने राज्य जयललितांकडेच सोपविले. तामीळनाडूतील निवडणुका म्हणजे ‘फुकट’, ‘मोफत’गिरीची स्पर्धा असते. मोबाईल, टीव्हीपासून मतदारांना सब कुछ मोफत देण्याच्या घोषणा होतात व निवडणूक आयोग येथे मूकबधिर होऊन बसलेला दिसतो. या सर्व राज्यांत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले नाही व ‘मोदी मॅजिक’ येथे चालले नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 
- आसामातला विजय हा भाजपसाठी संजीवनी घेऊन आला. बिहार पराभवाचा खोलवर रुतलेला काटा या विजयाने निघाला आहे. आसामात काँग्रेसचे राज्य १५ वर्षे होते. तरुण गोगोई यांचे वय आता ८२ वर्षे आहे व मंत्रालयाऐवजी बराच काळ ते इस्पितळात असतात. आसामात बांगलादेशी घुसखोर व भूमिपुत्रांचा संघर्ष निर्माण झाला. त्यात काँग्रेस मतांच्या लाचारीपोटी बांगलादेशी मुसलमानांच्या मागे उभी राहिली. त्या संतापाचे प्रतिबिंब आसामच्या निकालात दिसले. आसाम गण परिषदेशी झालेली युतीही भाजपास फायद्याची ठरली. शिवाय आसाममधील भाजपच्या विजयाला इतर पक्षातून आलेल्या काही मंडळींमुळेही हातभार लागला. त्यांचाही फायदा भाजपला झाला. म्हणजे तेथे मूळ भाजपवाले किती आणि निवडणुकीपूर्वी बाहेरून आलेले किती हा भाग येतोच.