शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

भाजपाने हिंदुत्वाशी नाते तोडले !

By admin | Updated: October 6, 2014 04:49 IST

हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व २५ वर्षांपासूनची युती तोडून भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच

नागपूर : हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व २५ वर्षांपासूनची युती तोडून भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्मभूमीत केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या रेशीमबागेतील स्मृती मंदिराजवळील मैदानावर रविवारी शिवसेनेची प्रचारसभा झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवानो’असे उपस्थितांना आवाहन करीत थेट हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातला. याच मैदानावर शुक्रवारी संघाचा दसरा महोत्सवाचा कार्यक्रम झाला. व्यासपीठाची जागाही तीच आहे. व्यासपीठ हिंदू विचाराचे आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्याच विचारावर युती झाली होती. मात्र भाजपाने युती तोडून हिंदुत्वाशी नाते तोडले. त्यांनी असे का केले याचा जाब त्यांना महाराष्ट्राला द्यावा लागेल, असे ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्ही सोबत होतो. दिल्ली आम्ही जिंकली, विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता युतीकडे सत्ता सोपवण्यासाठी उत्सुक होती. पण भाजपाला ते नको होते. भाजपासाठी आम्ही छातीवर वार झेलले. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा खुद्द शिवसेनाप्रमुखांनी ‘हो आम्ही मशीद पाडली’ असे जाहीरपणे सांगितले होते. अमरनाथ यात्रेच्या वेळीही आम्हीच हिंदूंसाठी आवाज उठविला. एवढेच नव्हे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेव्हा हिंदूराष्ट्राची संकल्पना मांडली तेव्हा त्याला समर्थन देणारी शिवसेनाच होती. शरद पवार यांनी जेव्हा संघावर टीका केली त्यालाही उत्तर शिवसेनेनेच दिले होते. भाजपासाठी आम्ही अनेक वेळा त्याग केला. इतर राज्यात आम्ही उमेदवार उभे केले नाही. पण भाजपाने पाठित खंजीर खुपसला, अशी टीका उद्धव यांनी केली. दिल्लीत तुम्ही (भाजपा) असताना महाराष्ट्रात आम्हाला त्रास का देता, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)