शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भाजपा आता बॅकफूटवर

By admin | Updated: November 9, 2015 03:25 IST

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची

यदु जोशी, मुंबईबिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची तक्रार आता त्यांना गांभीर्याने घ्यावी लागेल, असे दिसते. मुंबई महापालिकेच्या सव्वा वर्षावर आलेल्या निवडणुकीत बिहारमधील नव्या सत्तासमीकरणांचा फटका भाजपाला बसून, काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी गेल्या वर्षभरात दोघांनी विरोधक असल्याप्रमाणे एकमेकांवर टीका केली आहे. भाजपा आम्हाला सरकारमध्ये गृहीत धरते, अशी तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने केली होती. बिहारच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद यश मिळाले असते तर मित्रपक्षांची फारशी चिंता न करता महाराष्ट्रातील कारभार हाकण्याकडे पक्षाचा कल राहिला असता. राजकीय जाणकारांच्या मते, आता भाजपाला तशी मनमानी करता येणार नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ च्या सुरुवातीला होणार आहे. बिहारी आणि हिंदी भाषकांची मोठी मतसंख्या मुंबईत आहे. बिहारमध्ये जदयू-राजद-काँग्रेस आघाडी जिंकली आहे आणि त्यातील केवळ काँग्रेसच मुंबई महापालिकेची निवडणूक लढते, हे लक्षात घेता बिहारमधील निकालांचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो. मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मूळ बिहारीच आहेत. मुंबईत मराठी भाषकांची मते मुख्यत्वे शिवसेनेला आणि गेल्या दोन निवडणुकांपासून मनसेकडेही जातात. हिंदी मतदारांचा कल मुख्यत्वे काँग्रेसकडे राहत आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपाची खुमखुमी लपून राहिलेली नाही. युती न करता लढलो तर बिहारींसह हिंदी भाषकांची मते मोठ्या प्रमाणात मिळतील, असा भाजपाचा होरा असावा. मात्र आजच्या निकालाने त्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपाला आत्मचिंतन करावे लागू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात संधी देण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली आहे. विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्या होत नसल्याबद्दल त्यांनी वेळोवेळी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. बिहारमधील निकालाच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांकडून या दोन्हींबाबत भाजपावर दबाव वाढू शकतो. वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर नियुक्त्यांबाबत ६०/४० चा फॉर्म्युला भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरला होता; पण भाजपाचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्याला केराची टोपली दाखवून मनमानी केली जात असल्याची तक्रार याच आठवड्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे वेध भाजपाला लागले आहेत; मात्र आजच्या निकालाने ही व्होट बँक भाजपासोबत जाईल की नाही, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नेते प्रचारापासून दूरबिहारमधील प्रचारामध्ये महाराष्ट्रातील एकाही भाजपा नेत्याला पाठविण्यात आले नव्हते. भाजपा शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तेत आहे. बिहारींमध्ये सेनेबद्दल राग असल्याने इकडचे नेते तिकडे गेले तर विपरीत परिणाम होईल, म्हणून महाराष्ट्रीय नेत्यांना पाठविले नव्हते.