शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

राज्यात भाजपा आता बॅकफूटवर

By admin | Updated: November 9, 2015 03:25 IST

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची

यदु जोशी, मुंबईबिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची तक्रार आता त्यांना गांभीर्याने घ्यावी लागेल, असे दिसते. मुंबई महापालिकेच्या सव्वा वर्षावर आलेल्या निवडणुकीत बिहारमधील नव्या सत्तासमीकरणांचा फटका भाजपाला बसून, काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी गेल्या वर्षभरात दोघांनी विरोधक असल्याप्रमाणे एकमेकांवर टीका केली आहे. भाजपा आम्हाला सरकारमध्ये गृहीत धरते, अशी तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने केली होती. बिहारच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद यश मिळाले असते तर मित्रपक्षांची फारशी चिंता न करता महाराष्ट्रातील कारभार हाकण्याकडे पक्षाचा कल राहिला असता. राजकीय जाणकारांच्या मते, आता भाजपाला तशी मनमानी करता येणार नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ च्या सुरुवातीला होणार आहे. बिहारी आणि हिंदी भाषकांची मोठी मतसंख्या मुंबईत आहे. बिहारमध्ये जदयू-राजद-काँग्रेस आघाडी जिंकली आहे आणि त्यातील केवळ काँग्रेसच मुंबई महापालिकेची निवडणूक लढते, हे लक्षात घेता बिहारमधील निकालांचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो. मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मूळ बिहारीच आहेत. मुंबईत मराठी भाषकांची मते मुख्यत्वे शिवसेनेला आणि गेल्या दोन निवडणुकांपासून मनसेकडेही जातात. हिंदी मतदारांचा कल मुख्यत्वे काँग्रेसकडे राहत आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपाची खुमखुमी लपून राहिलेली नाही. युती न करता लढलो तर बिहारींसह हिंदी भाषकांची मते मोठ्या प्रमाणात मिळतील, असा भाजपाचा होरा असावा. मात्र आजच्या निकालाने त्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपाला आत्मचिंतन करावे लागू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात संधी देण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली आहे. विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्या होत नसल्याबद्दल त्यांनी वेळोवेळी नाराजीदेखील व्यक्त केली आहे. बिहारमधील निकालाच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांकडून या दोन्हींबाबत भाजपावर दबाव वाढू शकतो. वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर नियुक्त्यांबाबत ६०/४० चा फॉर्म्युला भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरला होता; पण भाजपाचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्याला केराची टोपली दाखवून मनमानी केली जात असल्याची तक्रार याच आठवड्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे वेध भाजपाला लागले आहेत; मात्र आजच्या निकालाने ही व्होट बँक भाजपासोबत जाईल की नाही, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नेते प्रचारापासून दूरबिहारमधील प्रचारामध्ये महाराष्ट्रातील एकाही भाजपा नेत्याला पाठविण्यात आले नव्हते. भाजपा शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तेत आहे. बिहारींमध्ये सेनेबद्दल राग असल्याने इकडचे नेते तिकडे गेले तर विपरीत परिणाम होईल, म्हणून महाराष्ट्रीय नेत्यांना पाठविले नव्हते.