शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप : १४ टक्के मतांच्या वाढीवर ७६ जागा पदरात; काँग्रेस : ४ टक्के मते घटली अन् ४० जागा गमावल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:07 IST

विधानसभा निवडणूक २०१४ : शिवसेनेच्या १९ जागांत वाढ, तर राष्ट्रवादीचे २१ जागांवर पाणी

नंदकिशोर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदींच्या त्सुनामिमुळे देशभरात काँग्रेस पक्षाची वाताहात झाली, परंतु सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात झाले. राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या १७ वरून थेट दोनवर आली. शिवाय, सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या या पक्षाला पायउतार व्हावे लागले. एखाद्या राजकीय लाटेत मतांची टक्केवारी आणि जागांचे गणित कसे बिघडून जाते, ते २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले.

सार्वत्रिक निवडणुकीचे गणित नेहमीच सरासरी मतांवर अवलंबून असते असे नाही. महाराष्ट्रातील मागील दोन विधानसभा (२००९-२०१४) निवडणुकीतील पक्षनिहाय मिळालेली मते आणि जागांचे विश्लेषण केले असता निवडणूक आकडेवारी शास्त्राला (शेफॉलॉजी) अभिप्रेत नसलेले निष्कर्ष हाती लागतात. २००९ च्या तुलनेत काँग्रेस पक्षाला अवघी ३.६ टक्के मते कमी पडली; मात्र एवढ्याशा घटीने या पक्षाला तब्बल ४० जागा गमावाव्या लागल्या. या उलट शिवसेनेच्या मतांत २ टक्क्यांची घट होऊनही या पक्षाला १९ जागांचा फायदा झाला. विशेष म्हणजे २०१४ साली भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.

युती न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय भाजप-सेनेच्या पथ्यावर पडला. तसा आघाडी न करण्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. असे का झाले, याची काही कारणं आहेत. एक, केंद्रातील मोदी सरकारचा फायदा भाजपला झाला. दोन, २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेच्या मतांवर मोठा डल्ला मारला होता; तो ‘राज’करिश्मा २०१४ च्या निवडणुकीत दिसून आला नाही. परिणामी, सेनेची व्होट बँक शाबुत राहिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईतील तब्बल १९ जागांवर पाणी सोडावे लागले.विदर्भाने दिली भाजपला साथआजवर काँग्रेसच्या पाठिशी राहाणाऱ्या विदर्भाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकमुखी साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विदर्भाने भाजपच्या पदरात ४३ जागा दिल्या. २००९ च्या तुलनेत तब्बल ३४ जागांची वाढ झाली. या उलट काँग्रेस पक्षाने विदर्भातील १४ तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा गमावल्या. शिवसेनेलाही ३ जागांवर पाणी सोेडावे लागले.
मुंबईत सेनाच मोठा भाऊ!मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न शिवसेनेने धुळीला मिळवले, शिवाय मुंबई, ठाणे आणि कोकणात २८ जागा जिंकून कोकण किनारपट्टीत आणि मायानगरीत आपणच मोठा भाऊ असल्याचे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध करून दाखवले. भाजपला २४ जागा मिळाल्या. मात्र, कोकणात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या उलट काँग्रेस (१४) आणि राष्टÑवादीला (५) या विभागातील १९ जागांवर पाणी सोडावे लागले.प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची हारराष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गत विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील (भाजपमध्ये जाण्यापूर्वी) असे दिग्गज नेते असतानाही राष्टÑवादी काँग्रेस २४ जागांवरून १९ जागांवर आला. बारामतीला लागून असलेल्या दौंड मतदारसंघात रासपचे राहुल कुल निवडून आले. याच आ. कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते.