शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप : १४ टक्के मतांच्या वाढीवर ७६ जागा पदरात; काँग्रेस : ४ टक्के मते घटली अन् ४० जागा गमावल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:07 IST

विधानसभा निवडणूक २०१४ : शिवसेनेच्या १९ जागांत वाढ, तर राष्ट्रवादीचे २१ जागांवर पाणी

नंदकिशोर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदींच्या त्सुनामिमुळे देशभरात काँग्रेस पक्षाची वाताहात झाली, परंतु सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात झाले. राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या १७ वरून थेट दोनवर आली. शिवाय, सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या या पक्षाला पायउतार व्हावे लागले. एखाद्या राजकीय लाटेत मतांची टक्केवारी आणि जागांचे गणित कसे बिघडून जाते, ते २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले.

सार्वत्रिक निवडणुकीचे गणित नेहमीच सरासरी मतांवर अवलंबून असते असे नाही. महाराष्ट्रातील मागील दोन विधानसभा (२००९-२०१४) निवडणुकीतील पक्षनिहाय मिळालेली मते आणि जागांचे विश्लेषण केले असता निवडणूक आकडेवारी शास्त्राला (शेफॉलॉजी) अभिप्रेत नसलेले निष्कर्ष हाती लागतात. २००९ च्या तुलनेत काँग्रेस पक्षाला अवघी ३.६ टक्के मते कमी पडली; मात्र एवढ्याशा घटीने या पक्षाला तब्बल ४० जागा गमावाव्या लागल्या. या उलट शिवसेनेच्या मतांत २ टक्क्यांची घट होऊनही या पक्षाला १९ जागांचा फायदा झाला. विशेष म्हणजे २०१४ साली भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.

युती न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय भाजप-सेनेच्या पथ्यावर पडला. तसा आघाडी न करण्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. असे का झाले, याची काही कारणं आहेत. एक, केंद्रातील मोदी सरकारचा फायदा भाजपला झाला. दोन, २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेच्या मतांवर मोठा डल्ला मारला होता; तो ‘राज’करिश्मा २०१४ च्या निवडणुकीत दिसून आला नाही. परिणामी, सेनेची व्होट बँक शाबुत राहिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईतील तब्बल १९ जागांवर पाणी सोडावे लागले.विदर्भाने दिली भाजपला साथआजवर काँग्रेसच्या पाठिशी राहाणाऱ्या विदर्भाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकमुखी साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विदर्भाने भाजपच्या पदरात ४३ जागा दिल्या. २००९ च्या तुलनेत तब्बल ३४ जागांची वाढ झाली. या उलट काँग्रेस पक्षाने विदर्भातील १४ तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा गमावल्या. शिवसेनेलाही ३ जागांवर पाणी सोेडावे लागले.
मुंबईत सेनाच मोठा भाऊ!मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न शिवसेनेने धुळीला मिळवले, शिवाय मुंबई, ठाणे आणि कोकणात २८ जागा जिंकून कोकण किनारपट्टीत आणि मायानगरीत आपणच मोठा भाऊ असल्याचे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध करून दाखवले. भाजपला २४ जागा मिळाल्या. मात्र, कोकणात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या उलट काँग्रेस (१४) आणि राष्टÑवादीला (५) या विभागातील १९ जागांवर पाणी सोडावे लागले.प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची हारराष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गत विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील (भाजपमध्ये जाण्यापूर्वी) असे दिग्गज नेते असतानाही राष्टÑवादी काँग्रेस २४ जागांवरून १९ जागांवर आला. बारामतीला लागून असलेल्या दौंड मतदारसंघात रासपचे राहुल कुल निवडून आले. याच आ. कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते.