शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बेदम चोप!

By admin | Updated: June 30, 2015 03:46 IST

थकलेली ऊसबिले व्याजासह अदा करण्याचे आदेश कारखान्यांना द्यावेत, या मागणीचे निवेदन देण्यास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेच्या

सोलापूर : थकलेली ऊसबिले व्याजासह अदा करण्याचे आदेश कारखान्यांना द्यावेत, या मागणीचे निवेदन देण्यास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडविणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा बेदम लाठीमार झेलावा लागला. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला होत असताना सहकारमंत्री उघड्या डोळ्याने बघत राहिले, असा आरोप करीत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी मंत्री पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर हे तर शेतकऱ्यांचे वैरी आहेत, अशी संतप्त टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. एफआरपीच्या (किफायतशीर व वाजवी दर) वादात कारखान्यांनी दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊसबिले चुकती केलेली नाहीत. ही देणी कारखान्यांनी व्याजासह शेतकऱ्यांना अदा केली पाहिजेत, ही संघटनेची मुख्य मागणी आहे. सोलापुरात सोमवारी दुपारी भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. तो आटोपून निघालेल्या सहकारमंत्री पाटील यांचा ताफा भैया देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडविला. गाड्या थांबल्याबरोबर व्याजासह ऊसबिलाचे वाटप करण्याच्या कारखान्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी पाटील यांच्याकडे केल्यावर, केंद्र सरकारकडून मदत मिळाल्याने बिले वाटपाची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर देशमुख यांनी बार्शी येथील साखर कारखान्याशी संबंधित बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तेव्हा ‘ते काम माझे नाही, गाड्या पुढे जाऊ द्या’, अशी पाटील यांनी सूचना केली. तेव्हा पाटील यांच्या गाडीपुढे घोषणा देत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी ठिय्या दिला आणि प्रचंड संख्येत असलेले पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. बंदोबस्तावरील पोलीस निरीक्षक ओमासे व कमांडो पथकाने कार्यकर्त्यांवर बेदम लाठीमार सुरू केला. यामुळे पळापळ सुरू झाली. चपला तेथेच टाकून मिळेल त्या रस्त्याने कार्यकर्ते पळू लागले़ यातून सहकार मंत्र्यांची गाडी व पोलिसांचा ताफा मार्गस्थ झाला. त्यानंतर पोलिसांच्या कृतीचा निषेध व्यक्त करणाऱ्या भैया देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून व्हॅनमध्ये घातले. तेव्हाही कार्यकर्ते व पोलिसांत झटापट झाली. यावेळीबार्शीहून आलेले भाजपाचे कार्यकर्ते छोटूभाई लोहे यांनीही या कृत्याबाबत नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)एफआरपी मागणाऱ्या शेतकऱ्यांना काठ्या मारणारे हे सरकार बिल्डरांसाठी पायघड्या घालण्याचे काम करते. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दोन मिनिटांचाही वेळ नसणारे हे सरकार गुन्हेगाराप्रमाणे शेतकऱ्यांना दंडूके घालत आहे. हे तर शेतकऱ्यांचे वैरी आहेत़ दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करत नाही, पीक कर्ज देत नाही, भाव देत नाही़ त्यांच्या हक्काचा विमा मंजूर होऊनही तो मिळत नाही. या सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?- धनंजय मुंडे , विरोधी पक्षनेते, विधान परिषदन्याय्य मागण्यांसाठी शेतकरी सहकारमंत्र्यांच्या गाडीसमोर बसले. त्यांच्यावर सराईत गुन्हेगार किंवा हिंसक जमावाप्रमाणे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती. शेतकऱ्यांपेक्षा पोलिसांची संख्या तिपटीने होती. इतर मार्गानेही कार्यकर्त्यांना हटविता आले असते. पण पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. सहकारमंत्री शेतकऱ्यांना सामोरे आले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. लाठीमारचा आदेश मी दिलेला नाही. उलट मी देशमुख यांचे निवेदन स्वीकारले आहे. ऊसबिलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे मी त्यांना सांगितले आहे. - चंद्रकांत पाटील, सहकार व बांधकाममंत्रीबार्शीच्या कुमदा साखर कारखान्याने शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. त्यावर कसलीच कारवाई केली नाही. सरकार आणि कारखानदार एकच आहेत याचा आज प्रत्यय आला. - भैया देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना