शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

नगरमध्ये तिळ्यांचा जन्म

By admin | Updated: August 4, 2016 21:53 IST

लग्नानंतर सात वर्षे अपत्यप्राप्ती नसलेल्या एका महिलेच्या पोटी तिळ्या मुलांचा जन्म झाला असून, विशेष म्हणजे तीनही मुलांची प्रकृती सुदृढ आहे़

- साहेबराव नरसाळे

अहमदनगर, दि. ४ : लग्नानंतर सात वर्षे अपत्यप्राप्ती नसलेल्या एका महिलेच्या पोटी तिळ्या मुलांचा जन्म झाला असून, विशेष म्हणजे तीनही मुलांची प्रकृती सुदृढ आहे़ अपत्य होत नसल्यामुळे लग्नानंतर सातत्याने सात वर्ष उपचार घेणाऱ्या नगरमधील एका महिलेला तिळी अपत्यप्राप्ती झाली आहे़ यातील पहिला मुलगा १७०० ग्रॅमचा तर दुसरा व तिसरा मुलगा १८०० ग्रॅम वजनाचा आहे़ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तीनही मुलांची प्रकृती चांगली आहे़ सध्या या महिलेचे वय तीस आहे़.

गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यात (३४ आठवडे) या महिलेची प्रसुती झाली़ सोनाग्राफीमध्ये तीन मुले असल्याचे निष्पन्न झाले होते़ डॉक्टर बन्सी शिंदे व डॉ़ स्मिता शिंदे यांनी यातील एक मुल कमी (एमब्रीयो रिडक्शन) करण्याचा सल्ला संबंधित दाम्पत्याला दिला होता़ मात्र, मातेने सर्व गर्भ ठेवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार डॉक्टरांनी उपचार सुरु केले़ मंगळवारी शिंदे हॉस्पिटलमध्ये या महिलेची प्रसुती झाली असून, तीन मुले जन्मास आली आहे़ आई व मुलांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़