शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी ठरले दिवाळीच्या फटाक्यांचे बळी

By admin | Updated: November 15, 2015 02:18 IST

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे

अझहर शेख,  नाशिकप्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सण-उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांज्यामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धूमधडाक्यामुळे पक्ष्यांना अपाय होतात. दीपावलीचा उत्सव सुरू झाला की, फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायुप्रदूषण पक्ष्यांच्या जीवावर बेतणारे ठरते. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच, पक्षी बिथरतात आणि घबराटीने काही मृत्युमुखी पडतात. काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात. मात्र, त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. अडथळ्यांवर आपटून पक्षी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये अनेक संस्था व पक्षीप्रेमींनी सोशल मीडियाबरोबरच फटाक्यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. वाढती मानवी वस्ती व शाश्वत विकास संकल्पना अंमलात न आणता केली जाणारी विकासकामे, यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास शहर परिसरातून जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वड, पिंपळ, नांद्रुक, करंज, उंबर, कडुनिंब, चिंच यांसारखे पर्यावरणपूरक व जैवविविधता जोपासणारे आणि अन्न, निवारा या गरजा भागविणाऱ्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येत आहे. त्यातच सण-उत्सवांचे बदलते स्वरूप पक्ष्यांच्या मुळावर आले आहे.तीन दिवसांपूर्वीच जखमी अवस्थेतील कोकिळेला सोडविण्यात आले. धनत्रयोदशीपासून तुलसी विवाहापर्यंत जखमी पक्ष्यांच्या ‘रेस्क्यू’चे कॉल दिवाळीमध्ये दरवर्षी येतात. फटाक्यांमुळे पक्षी व पर्यावरणाची अपरिमित हानी होते.- शेखर गायकवाड, पक्षिमित्र