शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांचे निवारे धोक्यात

By admin | Updated: May 20, 2016 02:35 IST

विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली

देहूगाव : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जगाला संदेश देणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या श्रीक्षेत्र देहूगावात इंद्रायणी नदीच्या काठावर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.इंद्रायणी नदीवर ११२ मीटर रुंद व ७.५ मीटर रुंदीच्या पुलांचे आणि त्यांना जोडणाऱ्या दोन १०० फूट रस्त्याचे कामदेखील सुरू आहे. आणखी एका पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. वारकऱ्यांची सोय, पूर नियंत्रण आणि नदीचे सौंदर्य वाढावे, यासाठी पूर्व किनाऱ्यावर घाट बांधण्यात येत आहे. याच घाटाला लागूनच स्मशानभूमी व उर्वरित घाटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम करताना किनाऱ्यावरील करंज व इतर जंगली झाडे यांची काही अंशी कत्तल करावी लागली. या झाडांवर पक्ष्याची ती घरटी होती. दररोज सकाळी सहाच्या सुमारास व सायंकाळी किंवा कातरवेळी या पक्ष्यांचे थवे आकाशात झेपावत दिसत असत. वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे निवारेच नष्ट होण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहे.देहूगावामध्ये डीजे बंदीचा ठराव होऊनही मोठ्या आवाजाचे डीजे वाजविले जातात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही येथील शांततेचा भंग होत असून, या पक्ष्याच्या निवाऱ्यांवर परिणामी होत असल्याचे जाणवत आहे. श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथा याच परिसरात बुडविल्या असल्याने या परिसराला मोठा इतिहास आहे. शांत जागा म्हणूनही ही जागा प्रसिद्ध होती. मात्र, अलीकडे या भागातील शांतताच हरवली आहे. (वार्ताहर)झाडांची कत्तल होत आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईमुळे फटाक्यांच्या आवाजाच्या ध्वनिप्रदूषणामुळे येथील पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे. सायंकाळी नदीच्या किनाऱ्यावरील वृक्षावर विसावणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांचे दृश्य आता दुर्मीळ होऊ लागले आहे. नदीकाठावरील वृक्षवल्लीला घरघर लागलेली दिसत आहे.विकास तर झालाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर संत तुकाराममहाराजांनी चारशे वर्षांपूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून वृक्ष आणि वनचरांचे महत्त्व सांगितले आहे, हे लक्षात घेऊन या पक्ष्यांचे जीवन वाचवावे व वृक्षांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षारोपण करावे, अशी मागणी येथील निसर्गप्रेमींकडून होत आहे.