शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

पक्ष्यांचे निवारे धोक्यात

By admin | Updated: May 20, 2016 02:35 IST

विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली

देहूगाव : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जगाला संदेश देणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या श्रीक्षेत्र देहूगावात इंद्रायणी नदीच्या काठावर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.इंद्रायणी नदीवर ११२ मीटर रुंद व ७.५ मीटर रुंदीच्या पुलांचे आणि त्यांना जोडणाऱ्या दोन १०० फूट रस्त्याचे कामदेखील सुरू आहे. आणखी एका पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. वारकऱ्यांची सोय, पूर नियंत्रण आणि नदीचे सौंदर्य वाढावे, यासाठी पूर्व किनाऱ्यावर घाट बांधण्यात येत आहे. याच घाटाला लागूनच स्मशानभूमी व उर्वरित घाटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम करताना किनाऱ्यावरील करंज व इतर जंगली झाडे यांची काही अंशी कत्तल करावी लागली. या झाडांवर पक्ष्याची ती घरटी होती. दररोज सकाळी सहाच्या सुमारास व सायंकाळी किंवा कातरवेळी या पक्ष्यांचे थवे आकाशात झेपावत दिसत असत. वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे निवारेच नष्ट होण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहे.देहूगावामध्ये डीजे बंदीचा ठराव होऊनही मोठ्या आवाजाचे डीजे वाजविले जातात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही येथील शांततेचा भंग होत असून, या पक्ष्याच्या निवाऱ्यांवर परिणामी होत असल्याचे जाणवत आहे. श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथा याच परिसरात बुडविल्या असल्याने या परिसराला मोठा इतिहास आहे. शांत जागा म्हणूनही ही जागा प्रसिद्ध होती. मात्र, अलीकडे या भागातील शांतताच हरवली आहे. (वार्ताहर)झाडांची कत्तल होत आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईमुळे फटाक्यांच्या आवाजाच्या ध्वनिप्रदूषणामुळे येथील पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे. सायंकाळी नदीच्या किनाऱ्यावरील वृक्षावर विसावणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांचे दृश्य आता दुर्मीळ होऊ लागले आहे. नदीकाठावरील वृक्षवल्लीला घरघर लागलेली दिसत आहे.विकास तर झालाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर संत तुकाराममहाराजांनी चारशे वर्षांपूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून वृक्ष आणि वनचरांचे महत्त्व सांगितले आहे, हे लक्षात घेऊन या पक्ष्यांचे जीवन वाचवावे व वृक्षांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षारोपण करावे, अशी मागणी येथील निसर्गप्रेमींकडून होत आहे.