शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जैविक किटकनाशकाला शेतक-यांची पसंती!

By admin | Updated: June 24, 2015 01:31 IST

राज्यातील स्थिती ; अडीच पटीने वापर वाढला.

संतोष वानखडे / वाशिम : रासायनिक किटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी राज्यातील शेतकरी हळूहळू जैविक किटकनाशकांच्या वापराकडे वळला असल्याची साक्ष कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. २0१३- १४ या वर्षात राज्यात १ हजार ४३३ मेट्रीक टन जैविक किटकनाशकांचा वापर झाला होता. २0१४-१५ मध्ये हाच आकडा ३ हजार ९७५ मेट्रीक टनावर पोहोचला. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल होत आहेत. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगांना पिकांवरील विविध प्रकारची रोगराई काही प्रमाणात अडथळा निर्माण करीत असते. यावरही काळानुसार उपाययोजना शोधून काढण्यात आल्या. रोगराई व किडींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक व जैविक किटकनाशकांचा वापर केला जातो. जैविक किटकनाशकांऐवजी रासायनिक किटकनाशकांचे परिणाम तत्काळ दिसत असल्याने शेतकरी रासायनिक खतांकडे मोठय़ा संख्येने वळले. यातूनच रासायनिक किटकनाशकांचा अतिरेक होत गेला. कीटकनाशकांचा ज्यादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. विविध प्रकारचा भाजीपाला व फळांवर अतिरिक्त रासायनिक किटकनाशकांचा अंश काही प्रमाणात राहत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला. याशिवाय हा प्रकार जमिनीचा पोतही काही प्रमाणात बिघडवू शकतो. हे टाळण्यासाठी रासायनिक किटकनाशकांचा योग्य वापर करणे किंवा जैविक किटकनाशकाचा वापर वाढविणे, याबाबत कृषी विभाग शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करीत आहे. परिणामी, शेतकरी हळुहळु जैविक किटकनाशकांकडे वळत असल्याचे राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.