शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

जैविक किटकनाशकाला शेतक-यांची पसंती!

By admin | Updated: June 24, 2015 01:31 IST

राज्यातील स्थिती ; अडीच पटीने वापर वाढला.

संतोष वानखडे / वाशिम : रासायनिक किटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी राज्यातील शेतकरी हळूहळू जैविक किटकनाशकांच्या वापराकडे वळला असल्याची साक्ष कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. २0१३- १४ या वर्षात राज्यात १ हजार ४३३ मेट्रीक टन जैविक किटकनाशकांचा वापर झाला होता. २0१४-१५ मध्ये हाच आकडा ३ हजार ९७५ मेट्रीक टनावर पोहोचला. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल होत आहेत. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगांना पिकांवरील विविध प्रकारची रोगराई काही प्रमाणात अडथळा निर्माण करीत असते. यावरही काळानुसार उपाययोजना शोधून काढण्यात आल्या. रोगराई व किडींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक व जैविक किटकनाशकांचा वापर केला जातो. जैविक किटकनाशकांऐवजी रासायनिक किटकनाशकांचे परिणाम तत्काळ दिसत असल्याने शेतकरी रासायनिक खतांकडे मोठय़ा संख्येने वळले. यातूनच रासायनिक किटकनाशकांचा अतिरेक होत गेला. कीटकनाशकांचा ज्यादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. विविध प्रकारचा भाजीपाला व फळांवर अतिरिक्त रासायनिक किटकनाशकांचा अंश काही प्रमाणात राहत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला. याशिवाय हा प्रकार जमिनीचा पोतही काही प्रमाणात बिघडवू शकतो. हे टाळण्यासाठी रासायनिक किटकनाशकांचा योग्य वापर करणे किंवा जैविक किटकनाशकाचा वापर वाढविणे, याबाबत कृषी विभाग शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करीत आहे. परिणामी, शेतकरी हळुहळु जैविक किटकनाशकांकडे वळत असल्याचे राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.