शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

जैविक किटकनाशकाला शेतक-यांची पसंती!

By admin | Updated: June 24, 2015 01:31 IST

राज्यातील स्थिती ; अडीच पटीने वापर वाढला.

संतोष वानखडे / वाशिम : रासायनिक किटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच जमिनीचा पोत कायम ठेवण्यासाठी राज्यातील शेतकरी हळूहळू जैविक किटकनाशकांच्या वापराकडे वळला असल्याची साक्ष कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. २0१३- १४ या वर्षात राज्यात १ हजार ४३३ मेट्रीक टन जैविक किटकनाशकांचा वापर झाला होता. २0१४-१५ मध्ये हाच आकडा ३ हजार ९७५ मेट्रीक टनावर पोहोचला. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही आमुलाग्र बदल होत आहेत. भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी शेतीत नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगांना पिकांवरील विविध प्रकारची रोगराई काही प्रमाणात अडथळा निर्माण करीत असते. यावरही काळानुसार उपाययोजना शोधून काढण्यात आल्या. रोगराई व किडींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक व जैविक किटकनाशकांचा वापर केला जातो. जैविक किटकनाशकांऐवजी रासायनिक किटकनाशकांचे परिणाम तत्काळ दिसत असल्याने शेतकरी रासायनिक खतांकडे मोठय़ा संख्येने वळले. यातूनच रासायनिक किटकनाशकांचा अतिरेक होत गेला. कीटकनाशकांचा ज्यादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. विविध प्रकारचा भाजीपाला व फळांवर अतिरिक्त रासायनिक किटकनाशकांचा अंश काही प्रमाणात राहत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला. याशिवाय हा प्रकार जमिनीचा पोतही काही प्रमाणात बिघडवू शकतो. हे टाळण्यासाठी रासायनिक किटकनाशकांचा योग्य वापर करणे किंवा जैविक किटकनाशकाचा वापर वाढविणे, याबाबत कृषी विभाग शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करीत आहे. परिणामी, शेतकरी हळुहळु जैविक किटकनाशकांकडे वळत असल्याचे राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.