शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही केंद्राने मदत करावी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 12, 2015 17:51 IST

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असून केंद्र सरकारने ज्याप्रमाणे बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज दिले तशीच भरघोस मदत महाराष्ट्रालाही करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १२ - दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असताना केंद्र सरकारने बिहारप्रमाणेच महाराष्ट्रालाही भरघोस मदत केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. 
केंद्र सरकारने बिहारसाठी सव्वा लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. सरकारने त्यांना जरूर मदत करावी पण मग तशीच मदत महाराष्ट्रालाही मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने दुष्काळासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, मात्र त्याची अमलबजावणी होणेही महत्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करून त्यादृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत, असे उद्धव यांनी सांगितले.
दरम्यान मांसाहार बंदीच्या वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. मांसाहार बंदीवर आमच्या बाजूने पडदा पडला आहे, त्यामुळे इतरांनी आता वाद चिघळवू नये अन्यथा नको ती परिस्थिती उद्भवेल असा इशारा उद्धव यांनी दिला. 
शिवसेना राबवणार कन्यादान योजना
दरम्यान दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी शिवसेनेतेर्फे 'कन्यादा योजना' राबवण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही योजना राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत सेनेकडून 'पीडितांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्यात येईल' अशी माहिती उद्धव यांनी दिली.