शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही केंद्राने मदत करावी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 12, 2015 17:51 IST

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असून केंद्र सरकारने ज्याप्रमाणे बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज दिले तशीच भरघोस मदत महाराष्ट्रालाही करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १२ - दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असताना केंद्र सरकारने बिहारप्रमाणेच महाराष्ट्रालाही भरघोस मदत केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. 
केंद्र सरकारने बिहारसाठी सव्वा लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. सरकारने त्यांना जरूर मदत करावी पण मग तशीच मदत महाराष्ट्रालाही मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने दुष्काळासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, मात्र त्याची अमलबजावणी होणेही महत्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करून त्यादृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत, असे उद्धव यांनी सांगितले.
दरम्यान मांसाहार बंदीच्या वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. मांसाहार बंदीवर आमच्या बाजूने पडदा पडला आहे, त्यामुळे इतरांनी आता वाद चिघळवू नये अन्यथा नको ती परिस्थिती उद्भवेल असा इशारा उद्धव यांनी दिला. 
शिवसेना राबवणार कन्यादान योजना
दरम्यान दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी शिवसेनेतेर्फे 'कन्यादा योजना' राबवण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही योजना राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत सेनेकडून 'पीडितांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्यात येईल' अशी माहिती उद्धव यांनी दिली.