शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही केंद्राने मदत करावी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 12, 2015 17:51 IST

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असून केंद्र सरकारने ज्याप्रमाणे बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज दिले तशीच भरघोस मदत महाराष्ट्रालाही करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १२ - दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असताना केंद्र सरकारने बिहारप्रमाणेच महाराष्ट्रालाही भरघोस मदत केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. 
केंद्र सरकारने बिहारसाठी सव्वा लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. सरकारने त्यांना जरूर मदत करावी पण मग तशीच मदत महाराष्ट्रालाही मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने दुष्काळासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, मात्र त्याची अमलबजावणी होणेही महत्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करून त्यादृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत, असे उद्धव यांनी सांगितले.
दरम्यान मांसाहार बंदीच्या वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. मांसाहार बंदीवर आमच्या बाजूने पडदा पडला आहे, त्यामुळे इतरांनी आता वाद चिघळवू नये अन्यथा नको ती परिस्थिती उद्भवेल असा इशारा उद्धव यांनी दिला. 
शिवसेना राबवणार कन्यादान योजना
दरम्यान दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी शिवसेनेतेर्फे 'कन्यादा योजना' राबवण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही योजना राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत सेनेकडून 'पीडितांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्यात येईल' अशी माहिती उद्धव यांनी दिली.