शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

बिहारमध्ये शिवसेनेचा भाजपालाही दणका

By admin | Updated: November 9, 2015 03:30 IST

शिवसेना आणि जनता दल (युनायटेड) यांच्यातील निवडणूक चिन्हाच्या साधर्म्यामुळे भारतीय जनता पार्टीनेच शिवसेनेला रिंगणात उतरवले.

संदीप प्रधान, मुंबईशिवसेना आणि जनता दल (युनायटेड) यांच्यातील निवडणूक चिन्हाच्या साधर्म्यामुळे भारतीय जनता पार्टीनेच शिवसेनेला रिंगणात उतरवले. मात्र, प्रत्यक्षात नितीश कुमार यांच्याबरोबरच नरेंद्र मोदींनाही शिवसेनेच्या उमेदवारांनी खाल्लेल्या मतांचा फटका बसला, असे चित्र समोर आले आहे.निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमार यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने व भाजपावर केलेली टीका लक्षात घेता, शिवसेना अधिक आक्रमक होणार असून, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळीही भाजपाला घसरत्या लोकप्रियतेवरून खिंडीत गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत.बिहारमध्ये शिवसेना १५० जागा लढवत असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात शिवसेनेने ८५ उमेदवार रिंगणात उतरवले होते व त्यापैकी ३७ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते. शिवसेनेला ४२ मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली असून, ती सुमारे अडीच लाखांच्या आसपास आहेत. या मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांनी मते खाल्ल्यामुळे भाजपालाही फटका बसला आहे.बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याने सांगितले की, जदयू व शिवसेना यांचे चिन्ह सारखी असल्याने, आम्ही उमेदवार उभे केले असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात आम्ही शिवसेनेचे वेगळे चिन्ह असल्याचे मतदारांवर ठसवले. त्यामुळेच लोहका मतदारसंघातील मनोजकुमार या शिवसेनेच्या उमेदवाराला १४ हजार ४५६ मते मिळाली. लकीसराय येथे रामप्रसाद मंडल याने ११ हजार ५५१ मते, भोचहा येथे रमईराम याने ११ हजार ८३६, बलरामपूरमध्ये ९ हजार ४७३, मोरबा येथे ९ हजार ३८०, जमालपूरमध्ये ८ हजार २८१ अशी लक्षणीय मते मिळवली. भाजपाने हिंदुत्वाबाबत केलेली धरसोड, आरक्षणाच्या प्रश्नाला हात घालण्याची चूक याचा फटका त्यांना बसला, असे मत बिहार निवडणुकीकरिता शिवसेनेचे प्रभारी व कामगार नेते सुनील चिटणीस यांनी व्यक्त केले. संघ मुख्यालयाबाहेर काँग्रेसकडून आतषबाजीनागपूर : बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपराजधानीत जोरदार जल्लोष केला. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आतषबाजी करण्यात आली, तसेच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर, मागील आठवड्यात विदर्भात नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेले यश व आता बिहारमधील महाआघाडीचा दणदणीत विजय, यामुळे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.कल समोर येताच, महाआघाडीचा विजय निश्चित झाला व काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या तालावर मिरवणूक काढली. केशवद्वाराजवळ दिवाळी साजरी केली. आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीदेखील संविधान चौकात दुपारी फटाके फोडले.संघ, भाजपात निराशानिकालानंतर भाजपा कार्यालय, तसेच संघ मुख्यालयात शुकशुकाट होता, तसेच संघाकडून निकालासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.