शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

बिहारमध्ये शिवसेनेचा भाजपालाही दणका

By admin | Updated: November 9, 2015 03:30 IST

शिवसेना आणि जनता दल (युनायटेड) यांच्यातील निवडणूक चिन्हाच्या साधर्म्यामुळे भारतीय जनता पार्टीनेच शिवसेनेला रिंगणात उतरवले.

संदीप प्रधान, मुंबईशिवसेना आणि जनता दल (युनायटेड) यांच्यातील निवडणूक चिन्हाच्या साधर्म्यामुळे भारतीय जनता पार्टीनेच शिवसेनेला रिंगणात उतरवले. मात्र, प्रत्यक्षात नितीश कुमार यांच्याबरोबरच नरेंद्र मोदींनाही शिवसेनेच्या उमेदवारांनी खाल्लेल्या मतांचा फटका बसला, असे चित्र समोर आले आहे.निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमार यांच्यावर उधळलेली स्तुतिसुमने व भाजपावर केलेली टीका लक्षात घेता, शिवसेना अधिक आक्रमक होणार असून, येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळीही भाजपाला घसरत्या लोकप्रियतेवरून खिंडीत गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत.बिहारमध्ये शिवसेना १५० जागा लढवत असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात शिवसेनेने ८५ उमेदवार रिंगणात उतरवले होते व त्यापैकी ३७ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते. शिवसेनेला ४२ मतदारसंघात लक्षणीय मते मिळाली असून, ती सुमारे अडीच लाखांच्या आसपास आहेत. या मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांनी मते खाल्ल्यामुळे भाजपालाही फटका बसला आहे.बिहारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या नेत्याने सांगितले की, जदयू व शिवसेना यांचे चिन्ह सारखी असल्याने, आम्ही उमेदवार उभे केले असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात आम्ही शिवसेनेचे वेगळे चिन्ह असल्याचे मतदारांवर ठसवले. त्यामुळेच लोहका मतदारसंघातील मनोजकुमार या शिवसेनेच्या उमेदवाराला १४ हजार ४५६ मते मिळाली. लकीसराय येथे रामप्रसाद मंडल याने ११ हजार ५५१ मते, भोचहा येथे रमईराम याने ११ हजार ८३६, बलरामपूरमध्ये ९ हजार ४७३, मोरबा येथे ९ हजार ३८०, जमालपूरमध्ये ८ हजार २८१ अशी लक्षणीय मते मिळवली. भाजपाने हिंदुत्वाबाबत केलेली धरसोड, आरक्षणाच्या प्रश्नाला हात घालण्याची चूक याचा फटका त्यांना बसला, असे मत बिहार निवडणुकीकरिता शिवसेनेचे प्रभारी व कामगार नेते सुनील चिटणीस यांनी व्यक्त केले. संघ मुख्यालयाबाहेर काँग्रेसकडून आतषबाजीनागपूर : बिहार निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आणि महाआघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपराजधानीत जोरदार जल्लोष केला. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग स्मृतिमंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आतषबाजी करण्यात आली, तसेच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर, मागील आठवड्यात विदर्भात नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेले यश व आता बिहारमधील महाआघाडीचा दणदणीत विजय, यामुळे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.कल समोर येताच, महाआघाडीचा विजय निश्चित झाला व काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या तालावर मिरवणूक काढली. केशवद्वाराजवळ दिवाळी साजरी केली. आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीदेखील संविधान चौकात दुपारी फटाके फोडले.संघ, भाजपात निराशानिकालानंतर भाजपा कार्यालय, तसेच संघ मुख्यालयात शुकशुकाट होता, तसेच संघाकडून निकालासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.