शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:28 IST

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले.

- राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावाच्या स्थितीमुळे देशातील आयुध निर्माणीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अनियमित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याची पुष्टी भद्रावती आयुध निर्माणीतील एका वरिष्ठ अधिकारी सूत्राने ‘लोकमत’कडे केली केली.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. तणावाची स्थिती आणि संबंधित घडामोडी बघता भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देशातील आयुध निर्माणीलाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यापासून या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून अनिश्चित काळासाठी असल्याची माहिती भद्रावती आयुध निर्माणीतील अधिकारी सूत्राने ‘लोकमत’ला दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या दाैऱ्यात होती हल्ल्याची शक्यतापंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वेचे उद्घाटन करणार होते. परंतु त्या दिवशी कटरा येथे वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने मोदी यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी अशा हल्ल्याचा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला होता.

कटरा ते श्रीनगर रेल्वेमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्याचा भाग देशाच्या अन्य राज्यांशी अधिक उत्तमप्रकारे जोडला जाणार आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यताही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीइस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती तेथील लष्करी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर सुमारे ४५० किमी अंतरापर्यंत मारा करू शकते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान