शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:28 IST

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले.

- राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक तणावाच्या स्थितीमुळे देशातील आयुध निर्माणीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अनियमित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याची पुष्टी भद्रावती आयुध निर्माणीतील एका वरिष्ठ अधिकारी सूत्राने ‘लोकमत’कडे केली केली.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. तणावाची स्थिती आणि संबंधित घडामोडी बघता भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देशातील आयुध निर्माणीलाही सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यापासून या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून अनिश्चित काळासाठी असल्याची माहिती भद्रावती आयुध निर्माणीतील अधिकारी सूत्राने ‘लोकमत’ला दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या दाैऱ्यात होती हल्ल्याची शक्यतापंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वेचे उद्घाटन करणार होते. परंतु त्या दिवशी कटरा येथे वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने मोदी यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी अशा हल्ल्याचा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला होता.

कटरा ते श्रीनगर रेल्वेमुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्याचा भाग देशाच्या अन्य राज्यांशी अधिक उत्तमप्रकारे जोडला जाणार आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यताही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानकडून अब्दाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीइस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती तेथील लष्करी अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर सुमारे ४५० किमी अंतरापर्यंत मारा करू शकते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान