शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

भुसावळ-मनमाड तिसरा मार्ग २०२५ पासून सेवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 08:52 IST

१८३ किलोमीटरचा रेल्वेमार्ग : आजमितीला ५० टक्के काम झाले पूर्ण

जळगाव : चाळीसगावपर्यंतचे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सध्या ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुसावळ-मनमाड तिसरा रेल्वेमार्ग २०२५ पर्यंत सेवेत दाखल होईल, अशी  माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई ते दिल्ली या मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासी व मालगाड्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. त्यामुळे सध्या दर दहा मिनिटाला गाडी धावत आहे. अप व डाऊन या दोन्ही मार्गांवर गाड्यांची वर्दळ वाढमुळे रेल्वे मंत्रालयाने २०१५ मध्ये भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्यामार्गाच्या कामाला मंजुरी दिली होती. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले. २०२० मध्ये जळगावहून पुढे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. ७१ किलोमीटरचा मार्ग केवळ दीड वर्षात पूर्ण केला आहे. सध्या या मार्गावरून मालगाड्या धावत आहेत. 

नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरण पूर्ण  नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. लवकरच चाळीसगावहून पुढे नांदगावपर्यंतच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

१३६० कोटींचा खर्चभुसावळ-मनमाड तिसऱ्या रेल्वेमार्ग साकारण्यासाठी १३६० कोटींचा खर्च होणार आहे. १८३ किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग सेवेत दाखल झाल्यावर प्रवाशांना जलद सेवा मिळणार आहे.

भुसावळ ते मनमाड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. २०२५ पर्यंत या मार्गावरून प्रत्यक्षात रेल्वे धावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

पाचोरा-चाळीसगावचे कामही प्रगतिपथावरजळगाव ते पाचोरादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामही हाती घेतले आहे. सध्या या मार्गावर सपाटीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले आहे. तसेच, भुयारी बोगद्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.