शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ-मनमाड तिसरा मार्ग २०२५ पासून सेवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 08:52 IST

१८३ किलोमीटरचा रेल्वेमार्ग : आजमितीला ५० टक्के काम झाले पूर्ण

जळगाव : चाळीसगावपर्यंतचे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सध्या ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुसावळ-मनमाड तिसरा रेल्वेमार्ग २०२५ पर्यंत सेवेत दाखल होईल, अशी  माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई ते दिल्ली या मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासी व मालगाड्यांची संख्या दुप्पट वाढली आहे. त्यामुळे सध्या दर दहा मिनिटाला गाडी धावत आहे. अप व डाऊन या दोन्ही मार्गांवर गाड्यांची वर्दळ वाढमुळे रेल्वे मंत्रालयाने २०१५ मध्ये भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्यामार्गाच्या कामाला मंजुरी दिली होती. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले. २०२० मध्ये जळगावहून पुढे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. ७१ किलोमीटरचा मार्ग केवळ दीड वर्षात पूर्ण केला आहे. सध्या या मार्गावरून मालगाड्या धावत आहेत. 

नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरण पूर्ण  नांदगाव ते मनमाड दरम्यान सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. लवकरच चाळीसगावहून पुढे नांदगावपर्यंतच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

१३६० कोटींचा खर्चभुसावळ-मनमाड तिसऱ्या रेल्वेमार्ग साकारण्यासाठी १३६० कोटींचा खर्च होणार आहे. १८३ किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग सेवेत दाखल झाल्यावर प्रवाशांना जलद सेवा मिळणार आहे.

भुसावळ ते मनमाड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. २०२५ पर्यंत या मार्गावरून प्रत्यक्षात रेल्वे धावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

पाचोरा-चाळीसगावचे कामही प्रगतिपथावरजळगाव ते पाचोरादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाचोरा ते चाळीसगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामही हाती घेतले आहे. सध्या या मार्गावर सपाटीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले आहे. तसेच, भुयारी बोगद्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.