शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा आरोपीला चोप

By admin | Updated: February 7, 2017 22:00 IST

सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओ पी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 7 - हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनीअर रसिला राजू ओ पी हिचा खून करणाऱ्या सुरक्षारक्षकाला भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी भर न्यायालयात चोप दिला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला तातडीने बाजूला नेले. पोलिसांनी तृत्पी देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. भाबेन भराली सैकिया या सुरक्षारक्षकाची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्याला पोलिसांनी दुपारी न्यायालयात आणले होते. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला २ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली होती. यास बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी. ए. आलुर, अ‍ॅड. तौसिफ शेख आणि अ‍ॅड. साजिद शाह यांनी विरोध केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे सैकिया याला पोलीस कोठडी देण्याची गरज नाही, असे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सैकिया याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.न्यायालयाच्या निर्णयानंतर दुपारी चारच्या सुमारास पोलीस त्याला घेऊन नव्या इमारतीच्या बाहेर आले. तोपर्यंत भूमाता ब्रिगेडच्या महिला कडेला दबा धरून बसल्या होत्या. तो बाहेर येताच या महिलांनी धावत जाऊन पोलिसांच्या मध्ये असलेल्या भाबेन याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्याच्याभोवती कडे करून पुन्हा मागे घेऊन गेले. त्यानंतर काही महिला बाजूला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला धावतच बाहेर नेण्यास सुरुवात केली. तेव्हा आणखी दोन-तीन महिलांनी त्याला अडवून चोप दिला. तृप्ती देसाई यांच्यासमवेत मनीषा टिळेकर, रंजना कांबळे, ख्वाजा बी मोमीन, प्रज्ञा जगताप, मंजिरी चौधरी या सहभागी झाल्या होत्या.

याविषयी बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले की, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही़ आमचा कायद्यावर विश्वास आहे. पण कोपर्डी प्रकरणात आरोपींना सहा महिन्यात शिक्षा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याला सहा महिने उलटूनही अजून शिक्षा झालेली नाही. पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली असती तर ही घटना घडली नसती. आरोपींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही ताईगिरी सुरू केली आहे. राज्यात जेथे जेथे अशा घटना घडतील तेथे भूमाताच्या रणरागिणी अशा गुन्हेगारांवर दहशत बसविणार आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हिंजवडीत आज वॉक विथ पोलीस सुरु केला आहे़ आम्ही त्यांना शहरातील अनेक अवैध धंदे दाखवून देण्यास तयार आहोत, त्या आमच्याबरोबर वॉक करतील का, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे. न्यायालयातील पोलिसांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या महिलांना ताब्यात घेतले व काही वेळाने सोडून दिले़