शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे भुशी धरण सुरक्षित, एकाचाही बळी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 16:48 IST

भुशी धरण कोणाचा तरी बळी घेतल्या शिवाय ओव्हर फ्लो होत नाही, हा या धरणाला लागलेला कलंक लोणावळा पोलीस प्रशासनाच्या कर्तव्य दक्षतेमुळे पुसला गेला आहे

- ऑनलाइन लोकमत
लोणावळा,  दि. १९ - पावसाळी पर्यटनाचे लोणावळ्यातील सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेले भुशी धरण कोणाचा तरी बळी घेतल्या शिवाय ओव्हर फ्लो होत नाही, हा या धरणाला लागलेला कलंक लोणावळा पोलीस प्रशासनाच्या कर्तव्य दक्षतेमुळे पुसला गेला आहे.  या वर्षी १५ आँगस्ट अखेर भुशी धरणावर कसलीही जिवितहानी झालेली नसल्याने आज अखेर भुशी धरण हे 'झिरो फेटालिटी धरण' बनले आहे. हे धरणच काय पण लोणावळ्यातील एकही पर्यटनस्थळांवर कोणाचा जीव जाऊ नये याकरिता सर्वोतोपरी खबरदारी घेणार असल्याचे लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
 
लोणावळ्याचे भुशी धरण व धरणाच्या पायर्‍यांवरुन वाहणारे पाणी हे राज्यभरातील पर्यटकांसह परराज्यातील पर्यटकांचे देखील मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. मात्र या धरणाला सुरक्षेच्या दृष्टीने कसलीही उपाययोजना नसल्याने अनेक पर्यटक धोकादायकरित्या या धरणाच्या जलाशयात उतरुन स्वतःचा जीव धोक्यात घालत असायचे, यामुळे धरणात सातत्याने पर्यटक बुडून मयत झालेल्या घटना घडत असायच्या. दरवर्षी सरासरी १० ते ११ पर्यटकांचा या धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यु झाले आहेत. बळी घेतल्याशिवाय भुशी धरण ओव्हर फ्लो होत नाही असा कलंक या धरणाला लागला होता. 
 
 भुशी धरणाच्या सुरक्षिततेबाबत लोकमतने वारंवार आवाज उठवत धरणाला सुरक्षा जाळ्या लावण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने धरणाच्या पायर्‍यांवरील बाजुला काटेतार लावली होती. तरी देखील पर्यटक डोंगराच्या बाजुने धरणात उतरत असल्याने गरजेनुसार डोंगराला देखिल सुरक्षा जाळ्या लावण्यात याव्यात अशी स्थानिकांची मागणी लोकमतने मांडली होती. तदनंतर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे व शहरचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश शितोळे यांनी स्वतः काही दानशुर व्यक्तीच्या मदतीने डोंगराच्या बाजुला सुरक्षा जाळी लावून घेतली होती. तसेच पावसाळा सुरु झाल्यापासून निरीक्षक जाधव यांनी भुशी धरणावर कडक बंदोबस्त तैनात करत धरणात उतरणार्‍या पर्यटकांवर कडक निबंर्ध घातल्याने गत तिन महिन्यात भुशी धरणात पर्यटक बुडाल्याची अथवा मयत झाल्याची एकही घटना घडली नाही. निरीक्षक जाधव यांनी या सर्व प्रकाराचे श्रेय लोणावळा शहरचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहे. संघ भावनेने वरिष्ठांच्या व माझ्या सुचनांप्रमाणे त्यांनी काम केल्यामुळेच आम्ही काही जीव वाचविण्यात यशस्वी झालो असे त्यांनी सांगितले.
पोलीसांची भुमिका काही वेळा नागरिकांना कठोर वाटत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेकरिता कठोर भुमिका घ्यावी लागते असेही त्यांनी सांगितले.
हुल्लडबाजांवर कारवाई सुरुच ठेवणार
पर्यटनाच्या नावाखाली दारु पिऊन धिंगाणा घालणे, महिलांची छेडछाड, अश्लिल हावभाव व शेरेबाजी, दारु पिऊन वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे प्रकार करणार्‍या हुल्लडबाजांवर कारवाई मोहिम सातत्याने सुरुच राहणार असल्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.