शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

डोंबिवलीत घरपोच मिळणार भाजी

By admin | Updated: February 27, 2017 04:09 IST

शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तेही थेट घरपोच डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे.

जान्हवी मोर्ये,डोंबिवली- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात आणि तेही थेट घरपोच डोंबिवलीकरांना उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे भाजीची नोंदणी नोंदवता येणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. पूर्वेतील पंचायत विहीर परिसरात राहणाऱ्या सुधीर गोगटे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गोगटे यांनी गणेशोत्सवापासून दादर आणि माहीम परिसरात ‘स्वस्त दरात भाजीपाला’ हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी त्यांनी काही राजकीय पक्षांचा आधार घेतला. परंतु, त्यांच्याकडून या उपक्रमात सातत्य दिसत नसल्याने त्यांनी स्वत:च ‘शेतकरी तुमच्या दारी’ या धर्तीवर हा उपक्रम डोंबिवलीत सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नोकरदार महिला घरची कामे उरकून कामाला जातात. घरी परतल्यानंतर स्वयंपाक, पाल्यांचा अभ्यास तसेच घरगुती कामे असतात. तसेच काही वयोवृद्ध मंडळींना बाजारात जाऊन भाजी खरेदी करणे शक्य होत नाही. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी भाजी काय करायची, हा प्रश्न असतोच. या मंडळींना त्यांच्या मागणीप्रमाणे पाव-अर्धा किलोपासून आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार घरपोच भाजी दिल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतला. विविध ग्रुप्सवर त्यांनी भाज्यांचा तपशील आणि दर देणे सुरू केले. सध्या त्यांच्याकडे दिवसाला ३५ पेक्षा जास्त ग्राहक भाजीसाठी नोंदणी करत आहेत. घरपोच भाजी देण्यासाठी ते कोणताही जास्त दर घेत नाहीत. याउलट त्यांच्याकडे भाज्या बाजारभावापेक्षा किमान दोन ते तीन रुपये स्वस्तच मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासाच मिळत आहे.बदलापूर, शहापूर या भागातील हंगामी स्वरूपात नगदी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोगटे फळभाज्या खरेदी करतात. या भाज्या दोन ते तीन दिवस चांगल्या टिकतात. पालेभाज्या एका दिवसात कोमेजून जातात. त्या टिकवण्यासाठी शीतगृह नसल्याने फळबाज्याच आणत असल्याचे गोगटे म्हणाले. रात्रीत माल खरेदी करून तो दुसऱ्या दिवशी लगेच विकण्यात गोगटे यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ग्राहकाला शेतीतील ताजी भाजी मिळते. शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांचे गणित जुळले आहे. काही शेतकरी गोगटे यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. गोगटे यांच्या मागणीनुसार माल बाजारसमितीत पोहोचवला जातो. त्यानंतर गोगटे तेथून तो उलचून ग्राहकांपर्यंत पोहचवतात. त्यासाठी ते टोम्पो, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशांत नेमाडे यांचा आधार घेतात. आठवड्यातून एक किंवा दोन दिवसाआड ते ३० ते ४० किलो माल आणतात. भविष्यात भाज्या निवडून, साफ करून देण्याचाही त्यांचा मानस आहे. तेसच अन्य ठिकाणीही स्वस्त भाजीपाला विक्रीची त्यांना शाखा सुरू करायची इच्छा आहे.