भिवंडी : दोन महिन्यांपासून मनपा कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत. काही कामगार कर्जबाजारी होत आहेत.मागील आर्थिक वर्षात चांगली वसुली झाल्याने काही अधिकाऱ्यांनी आपली पाठ थोपटून घेतली होती. अशा स्थितीत मार्च व एप्रिल महिन्याचा पगार झालेला नाही. राज्य सरकारकडूनही अपेक्षित निधी मिळत असतानाही केवळ कंत्राटदारांची बिले देण्यात प्रशासन गुंतल्याचा आरोप करत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत आहे.एलबीटी बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार नियमित व वेळेवर होण्यासाठी सरकारकडून आगाऊ रकमेचा धनादेश येतो. तरीही प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले जात नाहीत. (प्रतिनिधी)
भिवंडी पालिका कर्मचारी पगारापासून वंचित
By admin | Updated: April 29, 2016 04:27 IST