शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘भिकारी’ पोलिसांनी साडेचार तासांत केली अपहृत मुलाची सुटका

By admin | Updated: January 7, 2016 02:44 IST

रिक्षाचालकाच्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून, दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडाच्या पोलिसांनी अजब शक्कल लढवून मुसक्या आवळल्या

मुंबई : रिक्षाचालकाच्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून, दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या गुंडाच्या पोलिसांनी अजब शक्कल लढवून मुसक्या आवळल्या. भिकारी आणि फेरीवाले बनून पोलिसांनी तीन तासांच्या आत अपहृत मुलाची सुटका केली. घाटकोपरच्या आझादनगर परिसरात राहणारा आयान शेख, याच परिसरातील लिटल स्टार शाळेत पहिल्या इयत्तेत शिकतो. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर तो त्याच्या मित्रासह मस्ती करत होता. तेव्हा उमेश भागवत (३२) या तरुणाने त्याला खाऊचे आमिष दाखवून जवळ बोलावले. नंतर त्याला विद्याविहार परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. मुलाच्या ओळखपत्रावरील फोननंबर घेऊन त्याच्या वडिलांना फोन केला. मुलगा जिवंत हवा असल्यास दोन लाखांच्या खंडणीची मागणी करत, त्याने फोन ठेवला.मुलाचे वडील रफिक शेख हे रिक्षाचालक आहेत. मुलाचे अपहरण झाल्याने समजताच, रफिक यांनी तत्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेत, पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. दरम्यान, अपहरणकर्त्याने रफिक यांना पुन्हा फोन केला. खंडणी न मिळाल्यास मुलाला गोळी मारण्याची धमकी त्याने दिली. फोनवरील हे संभाषण घाटकोपर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसमोरच झाले. तेव्हा या मुलाला वाचवायचेच, असा निर्धार पोलिसांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी तातडीने पाच पथके तयार केली. सर्व पोलीस पथकांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विद्याविहार रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. आरोपीला संशय येऊ नये, म्हणून पोलिसांनी भिकारी, फेरीवाला, सामान्य नागरिक आणि रिक्षाचालक अशा वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये काही पोलीस तर फाटके कपडे घालून या परिसरातील फुटपाथवर झोपले होते, तर काही अधिकारी शेंगा विक्रेते आणि पाणीपुरीवाले बनले होते. या वेळी खंडणी घेण्यासाठी आलेल्या या आरोपीला पोलिसांनी तत्काळ झडप घालून ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा पोलिसांना आढळून आला. गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)