शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

भटजी न बोलावल्याने वाळीत टाकले!

By admin | Updated: March 9, 2015 01:36 IST

वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे

चिपळूण : वडिलांच्या बाराव्याला भटजीला बोलावले नाही म्हणून तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील साबळे कुटुंबाला दोन वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. साबळे कुटुंबाने न्याय मिळण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.दापोली तालुक्यात मुरुड, लोणवडी व चिखलगाव येथे मानपानावरून वाळीत टाकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता चिपळूण तालुक्यातही त्याचे लोण पसरल्याचे उघड झाले आहे. साबळे कुटुंबीयांनी रविवारी पत्रकार बैठक घटनेची माहिती दिली. मनोहर तुकाराम साबळे, चंद्रकांत तुकाराम साबळे हे मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील मूळ रहिवाशी असून, नोकरीनिमित्त ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी आई, काकी, काकू राहतात. ही मंडळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. २६ डिसेंबर २०१३ रोजी तुकाराम साबळे यांचे बारावे होते. त्यासाठी भटजीला न बोलविता आपण बारावे करणार आहोत, अशी कल्पना साबळे बंधूंनी वाडीची बैठक घेऊन दिली होती. परंतु, बाराव्याच्यावेळी वाडीतील काही लोकांनी जर तुम्हाला आमच्या मतांनी चालायचे नसेल, तर वाडीशी तुमचा संबंध राहणार नाही. तुमच्या सुखदु:खात, कोणत्याही कार्यक्रमात मार्गताम्हाणे गोपाळवाडी भाग घेणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर वाडीतील कोणाच्याही घरी साखरपुडा, विवाह, बारसे अथवा कोणताही सुखदु:खाचा प्रसंग असेल, तर आम्हाला कोणी बोलवत नाहीत. त्याप्रमाणे घरामध्ये आजूबाजुला कोणतेही मजुरीचे काम करायचे असेल तर मजुरी करणाऱ्या लोकांनादेखील घरी मजुरीसाठी पाठवत नाहीत, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. आम्हाला पुन्हा समाजात घ्यावे, यासाठी २ डिसेंबरला बैठक होणार होती. मात्र संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने ४ जानेवारीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली. बैठकीत तुम्ही आमच्या मताप्रमाणे वडिलांचे कार्य न केल्याने जर तुम्हाला वाडीत घ्यायचे असेल, तर दंड द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. परंतु, गुन्हा न केल्याने हे मंजूर नाही, असे सांगून बैठक आम्ही सोडली. तेव्हा लोक अंगावर धावून आले, असे साबळे कुटुंबीयांनी सांगितले. साबळे कुटुंबीयांच्या वाळीत प्रकरणाबाबत अंनिसचे निखिल भोसले, मनोहर साबळे आदींनी नाराजी व्यक्त केली.