शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भास्कर जाधवांबरोबर जमणे नाही

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

उदय सामंत : वृत्तीला कंटाळूनच राष्ट्रवादीचा त्याग

रत्नागिरी : मला गद्दार म्हणणारे भास्कर जाधव हेच खरे गद्दार आहेत. या विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जाधव यांनी षडयंत्र रचले होते. वेगवेगळ्या समाजातील उमेदवार माझ्या विरोधात उभे करण्याचा डाव त्यांनी रचला होता. अशा व्यक्तिबरोबर पक्षात राहून संघर्ष करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्षातून नेत्यांना सांगूनच चांगलेपणी बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. जाधव या वृत्तीबरोबर पक्षात राहून काम करणे आपणास शक्य नव्हते, असा हल्लाबोल सेनेचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांनी केला. विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार म्हणून विजय झाल्यानंतर कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनाच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण पक्ष का सोडला, याची कारणे १९ आॅक्टोबरला देऊ, असे सामंत यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, जाधव यांनी प्रत्येक वेळी पक्षात षडयंत्र रचली. षडयंत्रकारी नेता अशीच त्यांची ओळख आहे. त्याना सेनेत तिकीट मिळाले नाही म्हणून गद्दारी केली. जाधव यांनी चिपळूण पालिका निवडणुकीत वेगळी आघाडी करीत पक्षविरोधी काम केले. तटकरेंच्या निवडणुकीवेळीही षडयंत्र केले. अशा जाधवांना माझ्यावर गद्दारीचा आरोप करण्याचा अधिकारच नाही. अशा माणसाबरोबर पक्षात राहून काम करणे मला मान्य नाही. आपण पक्ष बदलला. मात्र, आपण पक्षांतर करताना वरिष्ठांबाबत कोणतीही टीका करणार नाही, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही सांगितले होते. सेनेत काम करताना विकासकामांनाच आपण प्राधान्य देणार असल्याचे सामंत म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे प्रवेशकर्तेवेळी दिलेले आश्वासन आपण नक्कीच पूर्ण करू असे ते म्हणाले. सामंत यांनी यावेळी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टिका केली व पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी जाधव यांच्या टिकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. सामंत यांनी विजयी झाल्यानंतर जाधव यांना पत्रकारपरिषदेतून फटकारले आहे. (प्रतिनिधी)