शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधवांबरोबर जमणे नाही

By admin | Updated: October 20, 2014 22:28 IST

उदय सामंत : वृत्तीला कंटाळूनच राष्ट्रवादीचा त्याग

रत्नागिरी : मला गद्दार म्हणणारे भास्कर जाधव हेच खरे गद्दार आहेत. या विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जाधव यांनी षडयंत्र रचले होते. वेगवेगळ्या समाजातील उमेदवार माझ्या विरोधात उभे करण्याचा डाव त्यांनी रचला होता. अशा व्यक्तिबरोबर पक्षात राहून संघर्ष करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्षातून नेत्यांना सांगूनच चांगलेपणी बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. जाधव या वृत्तीबरोबर पक्षात राहून काम करणे आपणास शक्य नव्हते, असा हल्लाबोल सेनेचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांनी केला. विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार म्हणून विजय झाल्यानंतर कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनाच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण पक्ष का सोडला, याची कारणे १९ आॅक्टोबरला देऊ, असे सामंत यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, जाधव यांनी प्रत्येक वेळी पक्षात षडयंत्र रचली. षडयंत्रकारी नेता अशीच त्यांची ओळख आहे. त्याना सेनेत तिकीट मिळाले नाही म्हणून गद्दारी केली. जाधव यांनी चिपळूण पालिका निवडणुकीत वेगळी आघाडी करीत पक्षविरोधी काम केले. तटकरेंच्या निवडणुकीवेळीही षडयंत्र केले. अशा जाधवांना माझ्यावर गद्दारीचा आरोप करण्याचा अधिकारच नाही. अशा माणसाबरोबर पक्षात राहून काम करणे मला मान्य नाही. आपण पक्ष बदलला. मात्र, आपण पक्षांतर करताना वरिष्ठांबाबत कोणतीही टीका करणार नाही, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही सांगितले होते. सेनेत काम करताना विकासकामांनाच आपण प्राधान्य देणार असल्याचे सामंत म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे प्रवेशकर्तेवेळी दिलेले आश्वासन आपण नक्कीच पूर्ण करू असे ते म्हणाले. सामंत यांनी यावेळी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टिका केली व पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी जाधव यांच्या टिकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. सामंत यांनी विजयी झाल्यानंतर जाधव यांना पत्रकारपरिषदेतून फटकारले आहे. (प्रतिनिधी)