शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

भिर्रर्रर्र...ची आरोळी पुन्हा गुंजणार

By admin | Updated: January 9, 2016 01:41 IST

केंद्र सरकारने बैलगाडा शर्यती सुरू केल्यानंतर बैलगाडामालकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला. शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून आता

केंद्र सरकारने बैलगाडा शर्यती सुरू केल्यानंतर बैलगाडामालकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला. शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून आता जिल्ह्यात पारंपरिक यात्रा उत्सवांमध्ये भिर्रर्रर्र...ची आरोळी पुन्हा गुंजणार आहे. गेली दोन वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाडाशर्यती सुरू करण्यासाठी बैलगाडामालकांनी सर्वत्र आंदोलने, चक्का जाम करून सरकारचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात वेळप्रसंगी बैलगाडामालकांनी न्यायालयातही धाव घेतली होती. अगदी पदरमोड करून अनेक बैलगाडामालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. अगदी पंजाब, तमिळनाडू आदी राज्यांत जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडामालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे.पदरमोड करून बैलगाडामालकांचे संघटनमंचर : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यती सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे शर्यती सुरू होण्यासाठी राजकीय नेतृत्वापासून सर्वसामान्य बैलगाडामालकांनी विशेष प्रयत्न केले. पदरमोड करून अनेक बैलगाडामालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. अगदी पंजाब, तमिळनाडू आदी राज्यांत जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडामालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे.बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी तालुक्यात अनेकवेळा आंदोलने झाली. २००६ मध्ये बैलगाडामालकांच्या आंदोलनाला मंचर येथे हिंसक वळण लागून झालेली घटना राज्यभर गाजली. तालुक्यात बैलगाडामालकांसाठी २ विमा योजना आहेत. त्यांनीही पुढाकार घेतला. शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाने बैलगाडामालकांना साथ दिली. शर्यती सुरू होण्यासाठी अनेक बैलगाडामालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. लोकवर्गनी गोळा करून त्यांनी शर्यती सुरू होण्यासाठी लढा दिला. त्याला आज यश आले आहे. दिल्ली येथे राहण्याचा व खाण्याचा खर्च बैलगाडामालक स्वत: करीत होते. बैलगाडामालकांचे शिष्टमंडळ अनेकवेळा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना जाऊन भेटले, त्यांनी पाठपुरावा केला. तमिळनाडू राज्यात जलीकट्टू व पंजाब राज्यात छकडी दौड होते. तेथील बैलगाडामालकांशी संपर्क करून, त्यांना एकत्रित करण्यात आले व एकत्रित प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला होता. तालुक्यातील काही बैलगाडामालक ४ ते ५ वेळा या राज्यांत जाऊन आले. आजच्या निर्णयाने त्यांना सर्वाधिक समाधान वाटले आहे. (वार्ताहर)व्यावसायिक व वाजंत्री यांना येणार ‘अच्छे दिन’बैलगाडा शर्यतीच्या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा चांगला व्यवसाय होतो. यामध्ये हॉटेल, थंड पेयांची दुकाने, विविध वस्तू, खेळणी यांची दुकाने थाटली जातात. पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या वाजंत्री मंडळींना तर सर्वाधिक मागणी असते. शर्यतीवर बंदी आल्याने हे व्यवसाय बंद झाले. वाजंत्री मंडळींना काम मिळेना. आता शर्यतीवरील बंदी उठल्याने, या व्यावसायिकांना व वाजंत्री मंडळींना ‘अच्छे दिन’ येणार आहेत. अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यांना पुन्हा काम व रोजगार मिळणार आहे. पहाडी आवाजात निवेदन करणारे अनाउन्सर (निवेदक) कुठेच दिसत नव्हते, त्यांना आता पुन्हा पूर्वीसारखे काम करता येणार आहे. बैलगाडामालकांनी दीड वर्ष केलेल्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. ग्रामीण भागासाठी शर्यती महत्त्वाची होत्या. शर्यतबंदीमुळे गावोगाव होणाऱ्या यात्रा जवळ-जवळ बंद झाल्या होत्या. अर्थकारण ठप्प झाले होते. आता शर्यतीवरील बंदी उठल्याने ग्रामीण भागाची परंपरा अखंड सुरू राहील. यापुढेही न्यायालयीन लढा लढला जाईल. - बाळासाहेब आरुडे याचिकाकर्ते व बैलगाडामालक, अवसरी कु ठल्याही गोष्टीला कायमस्वरूपी बंदी हा पर्याय नाही. शर्यती सुरू झाल्या. आता बैलगाडामालकांनी नियम व अटीचे पालन करावे म्हणजे शर्यती सुरळीत सुरू राहतील. ग्रामीण जनतेचे अर्थकारण ठप्प झाले होते. आता ते सुरळीत होईल. यात्रेचे आयोजन करताना आयोजकांनी अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. - नितीन शेवाळे बैलगाडामालक, याचिकाकर्ते, हडपसर