शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

CAA:आपण पाकिस्तान होत चाललो आहोत: भालचंद्र नेमाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 14:51 IST

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले.

मुंबई: देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याला प्रचंड विरोध होत असून ठीक-ठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर बऱ्याच राज्यात या आंदोलना हिंसक वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यांनतर आता याच मुद्यावरून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं असल्याचं अप्रत्यक्ष विधान केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेमाडे म्हणाले की, 'हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.” असे भालचंद्र नेमाडे यावेळी म्हणाले.

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले. तर वेगवेगळ्या नियतीने आपल्या देशात अनेक प्रकाराची लोकं येत असतात. त्यामुळे सर्वांची नियत सारखीच असेल असे म्हणता येणार नाही. तर ज्यांना भारत देशात राहणे पसंद असेल आणि त्यांना यायचं असेल तर त्यांना येऊ द्या, असे नेमाडे म्हणाले.

तर सरकराची मोठी यंत्रणा असून त्यावर मोठ्याप्रमाणावर खर्च सुद्धा करण्यात येते. त्यामुळे देशाला नुकसान पोहचवणारे लोकं कोण आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम सरकारचे आहे. मात्र एखांद्या सामान्य नागरिकाला देशाचा नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नसल्याचे सुद्धा भालचंद्र नेमाडे म्हणाले.