शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

CAA:आपण पाकिस्तान होत चाललो आहोत: भालचंद्र नेमाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 14:51 IST

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले.

मुंबई: देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याला प्रचंड विरोध होत असून ठीक-ठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर बऱ्याच राज्यात या आंदोलना हिंसक वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यांनतर आता याच मुद्यावरून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं असल्याचं अप्रत्यक्ष विधान केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेमाडे म्हणाले की, 'हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.” असे भालचंद्र नेमाडे यावेळी म्हणाले.

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले. तर वेगवेगळ्या नियतीने आपल्या देशात अनेक प्रकाराची लोकं येत असतात. त्यामुळे सर्वांची नियत सारखीच असेल असे म्हणता येणार नाही. तर ज्यांना भारत देशात राहणे पसंद असेल आणि त्यांना यायचं असेल तर त्यांना येऊ द्या, असे नेमाडे म्हणाले.

तर सरकराची मोठी यंत्रणा असून त्यावर मोठ्याप्रमाणावर खर्च सुद्धा करण्यात येते. त्यामुळे देशाला नुकसान पोहचवणारे लोकं कोण आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम सरकारचे आहे. मात्र एखांद्या सामान्य नागरिकाला देशाचा नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नसल्याचे सुद्धा भालचंद्र नेमाडे म्हणाले.