शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CAA:आपण पाकिस्तान होत चाललो आहोत: भालचंद्र नेमाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 14:51 IST

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले.

मुंबई: देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याला प्रचंड विरोध होत असून ठीक-ठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर बऱ्याच राज्यात या आंदोलना हिंसक वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यांनतर आता याच मुद्यावरून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं असल्याचं अप्रत्यक्ष विधान केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नेमाडे म्हणाले की, 'हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.” असे भालचंद्र नेमाडे यावेळी म्हणाले.

एनआरसी व सीएए हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग असून हा विषय राजकरणी लोकांचा नसल्याचे नेमाडे म्हणाले. तर वेगवेगळ्या नियतीने आपल्या देशात अनेक प्रकाराची लोकं येत असतात. त्यामुळे सर्वांची नियत सारखीच असेल असे म्हणता येणार नाही. तर ज्यांना भारत देशात राहणे पसंद असेल आणि त्यांना यायचं असेल तर त्यांना येऊ द्या, असे नेमाडे म्हणाले.

तर सरकराची मोठी यंत्रणा असून त्यावर मोठ्याप्रमाणावर खर्च सुद्धा करण्यात येते. त्यामुळे देशाला नुकसान पोहचवणारे लोकं कोण आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम सरकारचे आहे. मात्र एखांद्या सामान्य नागरिकाला देशाचा नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नसल्याचे सुद्धा भालचंद्र नेमाडे म्हणाले.