शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पडदा उघडण्यापूर्वीच नको भैरवी!--बेळगावात नांदी झालीच पाहिजे!

By admin | Updated: December 12, 2014 23:41 IST

बेळगाव नाट्यसंमेलन : नटेश्वराचा उत्सव रद्द न करण्याची सातारच्या रंगकर्मींची सीमाभागातील मराठी माणसाला विनंती

राजीव मुळ्ये - सातारा -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांची काही वक्तव्ये आणि त्यामुळे नाराज झालेल्या नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने आगामी नाट्य संमेलन घेण्यास दर्शविलेला नकार या घटनाक्रमाचे तरंग सातारच्या नाट्यवर्तुळातही उमटले. नाराजी बंद दरवाजाआड व्यक्त व्हावी; मात्र संमेलन रद्द होऊ नये, अशी कळकळीची अपेक्षा व्यक्त होत आहे. ही कळकळ व्यक्त करणारे पत्र नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने बेळगाव शाखेला लगेच धाडले आहे. संमेलनाचा पडदा उघडण्यापूर्वीच भैरवीचे सूर ऐकून रंगकर्मी व्यथित झाले आहेत.‘महाराष्ट्र राज्य’ असा उल्लेख असलेला फलक सीमाभागातील येळ्ळूर गावातून हटविल्यानंतर तेथे उमटलेले तीव्र पडसाद हीच बेळगावला नाट्य संमेलन घेण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी ठरली. त्यामुळे सीमाभागातील मराठीजनांच्या भावनांना संमेलनाच्या व्यासपीठावर वाचा फुटणे अपेक्षितच आहे, असे काहींचे मत आहे. हटविलेला फलक मराठी बांधवांनी पुन्हा लावल्यावर येळ्ळूरमध्ये अनेकांना घरातून ओढून मारहाण करण्यात आली होती. या घटनांचा निषेध करण्यास मराठी रंगकर्मींना उशीर झाला आणि सीमाभागात संताप व्यक्त करण्यात आला. बेळगावात नाट्य संमेलन भरवून याची भरपाई करता येईल, या हेतूनेच तेथे संमेलनाचा घाट घातला गेला. तथापि, हे कलावंतांचे व्यासपीठ असल्यामुळे राजकीय विषय संमेलनात होणार नाहीत, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितल्याने पुन्हा संताप उफाळून आला. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने हे संमेलन होऊ शकणार नाही, असे जाहीर करून टाकल्याने या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.त्या पार्श्वभूमीवर, सीमाभागात मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा कोणताही मराठी कार्यक्रम रद्द होता कामा नये, अशा प्रतिक्रिया नाट्य वर्तुळात उमटत आहेत. मराठी माणसाला क्षीण बनविण्यासाठी कर्नाटक सरकारचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असताना आपापसातील मतभेद इतके टोकाला जाता कामा नयेत, संमेलन झालेच पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे बेळगाव शाखेला याबाबत पत्र पाठविण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत संमेलन रद्द करण्याचा पर्याय स्वीकारू नये, अशी विनंती करण्यात आली आहे....सातारा शाखेतर्फे दरवर्षी ‘चलो बेळगाव’मराठी माणसांच्या जमिनीवर आरक्षण टाकणे, त्या जमिनी औद्योगिक क्षेत्राखाली आणणे, असे मार्ग वापरून मराठी माणसाला क्षीण करणारे कर्नाटक सरकार मराठी नाटकाची गाडी दिसताच भरमसाठ कर आकारते. त्यावर, बेळगावातच नाटकाचे नेपथ्य तयार करायचे आणि येथून फक्त कलावंतांनी जाऊन सीमाभागात प्रयोग सादर करायचे, असाही उपाय योजावा लागला होता. मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा घालण्याच्या कर्नाटकच्या खटाटोपांना उत्तर देण्यासाठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे दरवर्षी एक तरी मराठी कार्यक्रम सीमाभागात आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा या निमित्ताने करण्यात आली आहे.बेळगावच्या संमेलनाला येळ्ळूरच्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे. अशा स्थितीत संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी माणसांच्या व्यथा आणि भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. किंंबहुना तेथे संमेलन घेतल्यामुळे मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फुटून त्यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे बेळगावला संमेलन झालेच पाहिजे.- शिरीष चिटणीस, अध्यक्ष, नाट्य परिषद, शाखा सातारानाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी असेल, तर ती त्यांनी व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही. परंतु संमेलनच रद्द करण्याचा निर्णय घेणे योग्य नाही. तेथे संमेलन व्हावे, अशाच राज्यभरातील रंगकर्मींच्या भावना असून, तसे पत्र सातारा शाखेतर्फे बेळगावला पाठविले आहे. - राजेश मोरे, कार्यवाह, नाट्य परिषद, शाखा सातारामराठीच्या संवर्धनासाठी जे-जे उपयुक्त असेल, ते-ते बेळगाव आणि सीमाभागात झालेच पाहिजे. राजकीय चर्चा करण्याचे हे व्यासपीठ असावे की नसावे, यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. परंतु संमेलन रद्द होऊ नये; कारण संमेलनाला मिळणारा भरघोस प्रतिसादच बेळगावातील मराठी माणसांची शक्ती सिद्ध करण्याचे साधन असेल.- श्रीकांत देवधर, ज्येष्ठ रंगकर्मी, सातारामराठी माणसाला सीमाभागात हक्कांसाठी भांडावे लागतेच आहे. त्याला आता मराठी भाषकांशीही भांडावे लागू नये. वादविवाद, मतभेद यामधून चर्चेद्वारे सुवर्णमध्य काढला पाहिजे. परंतु बेळगावात नाट्य संमेलन व्हायलाच पाहिजे आणि वादांवर तोडगा काढण्यासाठी सुजाण रंगकर्मींनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत.- रवींद्र डांगे, अभिनेते-दिग्दर्शक, सातारा