शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

भैरप्पा, खरे यांची नाशिककरांना श्रवणपर्वणीं

By admin | Updated: July 25, 2016 14:48 IST

नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज संध्याकाळी नाशिककरांना प्रख्यात कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

सार्वजनिक वाचनालय : शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २५ - नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आज (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता नाशिककरांना प्रख्यात कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा व ज्येष्ठ हिंदी कवी डॉ. विष्णू खरे यांना एकाच व्यासपीठावर ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सावानाने प्रथमच हा योग जुळवून आणला आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात डॉ. एस. एल. भैरप्पा ‘भारतीयत्व आणि भारतीय साहित्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर डॉ. विष्णू खरे हे ‘मी आणि माझी वाचनालये’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सावानाच्या वतीने रविवारपासून शतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम सुरू आहेत.

रविवारी सकाळी डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी निमंत्रित मान्यवरांशी संवाद साधत आपला लेखनप्रवास उलगडून दाखवला. वयाच्या अकराव्या वर्षी आई गेली. त्यानंतर बहीण-भाऊ एकाच दिवशी प्लेगने मृत्यू पावले. पंधरा वर्षांचा असताना त्यांचे मृतदेह स्वत:च्या खांद्यावर वाहिले अन् मृत्यूविषयी चिंतन सुरू झाले. त्यातून तत्त्वज्ञानाकडे वळलो व लेखनाचा मार्ग सुकर झाला, असे ते म्हणाले. सन १९६२ मध्ये पीएच.डी. करीत असतानाच ‘वंश’ या विषयाने अस्वस्थ केले व कादंबरी आकार घेऊ लागली. भारतातील वंश संकल्पनेचा सखोल अभ्यास करून ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी लिहिली. त्यावर पुढे चित्रपटही आला. आपल्या या दुसऱ्या कादंबरीने आपल्याला कादंबरीकार म्हणून ओळख दिली; शिवाय आपल्यात बदलही घडवल्याचे डॉ. भैरप्पा म्हणाले. सायंकाळी डॉ. विष्णू खरे यांची मुलाखत कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी घेतली. त्यात डॉ. खरे यांनी अनेक विषयांवर रोखठोक मते व्यक्त केली. आपल्याकडचे चेतन भगत वगैरेंसारख्या लेखकांचे साहित्य सुमार दर्जाचे आहे. ते जाळून टाकायला हवे; पण हीच पुस्तके आज बेस्ट सेलर ठरत आहेत. पाश्चात्त्य देशांत पुस्तकांच्या लाखो प्रती खपतात. आपल्याकडे काही हजार पुस्तके विकली गेली तरी ती बेस्ट सेलर ठरतात. आर. के. नारायण यांच्यासारखे लेखक मात्र खरोखर कमिटेड होते, असे यावेळी डॉ. खरे म्हणाले.दरम्यान, आज सायंकाळी होणाऱ्या सोहळ्याला सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी आदि उपस्थित राहणार आहेत. दिग्गजांच्या उपस्थितीची परंपरानाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या शंभराव्या वर्धापनदिनास स्वातंत्र्यवीर सावरकर, १२५व्या वर्धापनदिनाला यशवंतराव चव्हाण, तर १५० व्या वर्धापनदिनाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची उपस्थिती होती. त्याच परंपरेचे जतन करीत यंदाच्या १७५ व्या वर्धापनदिनाला डॉ. एस. एल. भैरप्पा व डॉ. विष्णू खरे या दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.