शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

फसव्या कॉलपासून सावधान!

By admin | Updated: June 11, 2015 00:36 IST

सर्वसामान्यांची फसवणूक : प्रधानमंत्री जन-धन योजनेतून बोलत असल्याची बतावणी

यशवंत गव्हाणे - कोल्हापूर --‘हॅलो, हॅलो... प्रधानमंत्री जनधन योजना कार्यालय, दिल्ली से बात कर रहा हूँ. जनधन योजनाके अंतर्गत आपका मोबाईल नंबर सिलेक्ट किया गया है. इसके माध्यमसे आप को हर महिने कमसे कम २०,००० रुपये कमाने का मौका मिलेगा. आपको खाली रोज बीस से चालीस एसएमएस करना है. और लोगोंको प्रधानमंत्री जनधन योजनाकी जानकारी देना है’, अशा प्रकारची गळ घालणारे फोन करून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची हजारो रुपयांची फसवणूक केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री जनधन विमा योजना राबविली आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक यामुळे अल्प बचतीमध्ये विमा उतरू शकले. याच योजनांचा फायदा घेत सर्वसामान्य नागरिकांना गंडविण्याचा धंदा मांडला जात आहे. त्याला सर्वसामान्य नागरिक बळी पडतात. फोन केल्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेचे नाव घेतल्याने नागरिकांना शासकीय विमा योजनेबद्दल चौकशी करत असल्याचा गैरसमज होतो. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवतो. मग त्यांना योजनेची माहिती पुरविण्यासाठी तुमची निवड झाल्याचे सांगितले जाते. यासाठी तुम्हाला लॅपटॉप, स्मार्टफोन, सीमकार्ड खरेदी घेण्यासाठी एक लाख रुपयांचा चेक पाठविला जाणार आहे, तसेच सोबत जनधन योजनेच्या माहिती पुस्तिकाचे व्ही. पी. पार्सल पाठविले जाते. यासाठी संपूर्ण पत्ता विचारला जातो. जोपर्यंत पार्सल मिळत नाही, तोपर्यंत फोन केला जातो. जेव्हा तुम्ही ते व्ही. पी. पार्सल घेता, तेव्हा तुम्हाला २,६२५ रुपये भरावे लागतात. आणि पार्सल उघडल्यावर मात्र त्यात काहीच नसते. अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची सरळ सरळ फसवणूक केली जाते. महिन्यात येतात पाच-सहा फसवी पार्सल अशाच प्रकारचे एक पार्सल कोल्हापुरातील फुलेवाडी पोस्ट आॅफिसमध्ये आले होते. तिथे चौकशी केली असता समजले की, अशाप्रकारची पार्सल महिन्यात सात-आठ तरी येतात. आम्ही नागरिकांना याबाबत नेहमी जागृत करतो. तरीपण काहीजण अशी व्ही.पी. पार्सल स्वीकारतात. जेव्हा पार्सल उघडले जाते, तेव्हा त्यात कधी खोटी साखळी, अंगठी किंवा देवाचा लहान फोटो असतो. तसेच संबंधित व्यक्तीविरुद्ध जर खटला दाखल करायचा असेल, तर तेथील न्यायालयात दाखल करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते परवडणारे नसते व परराज्यात जाण्या-येण्याचा खर्च आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे अशी फसवणूक करणारे मोकाटच राहतात. फोन नंबर नॉट रिचेबलज्या नंबरवरून असे फोन येतात, ते नंबर फसवणूक झाल्यानंतर मात्र नॉट रिचेबल लागतात. फुलेवाडीत एका नागरिकाने असे पार्सल स्वीकारले नाही व ज्या नंबरवरून त्यांना फोन येत होता, त्या नंबरवर फोन केला असता त्यांनी प्रथम रिसीव्ह केला. मात्र, त्यांना याचा जाब विचारता त्यांनी फोन बंद केला. तो आजपर्यंत नॉट रिचेबल लागतो.