शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

चारसूत्री भात लागवडीचा प्रयोग आदिवासी भागात ठरला लाभदायी

By admin | Updated: October 24, 2016 08:36 IST

जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला

लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत

बेलगाव कुऱ्हे ( नाशिक), दि. २४ -  भाताचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या इगतपुरी तालुक्यात हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे राहिले असताना महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला आहे.आठवड्याभरात सोंगणीला वेग येणार असून भातशेतीतून उत्पादन देखील चांगले मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारीशिंगवे परिसरात भात कापणी सुरु झाली असून, मजूर खर्च परवडत नसल्यामुळे भात कापणी यंत्राच्या साहाय्याने येथील शेतकरी वसंत बोराडे, शिवाजी बोराडे, पांडुरंग बोराडे, गुलाब भले, कैलास भले, गोविंद लहांगे यांनी शेतात लागवड केलेली चारसुत्री भात कापणी सुरु केलेली आहे. मंडळ कृषी अधिकारी अरु ण पगारे, कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभत आहे. मुबलक पाऊस परंतु खडकाळ जमिनीमुळे तालुक्यातील वासाळी येथे कायमच दुष्काळी परिस्थिती असते. अशात शेतकरी धास्तावले होते. गेल्या चार वर्षात पावसाचे स्वरूप, उपलब्ध पाणीसाठा यावर अवलंबून शेतीवर मोठा विपरीत परिणाम होताना दिसत होता. तालुक्यात नैसर्गिक बदलाच्या समस्या ‘आ’वासून उभ्या असताना शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने व शेततळे झाल्यामुळे पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला. शेती संशोधन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असताना पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवारातील सिमेंट काँक्रीट बंधारे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले आहेत. भातशेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण करून आधुनिक पीकपद्धती राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.