शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सरकारात मंत्री असल्यामुळे मी कोणालाही भेटू शकतो - सदाभाऊ खोत

By admin | Updated: June 16, 2017 20:26 IST

सरकारात मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त मी कोणालाही भेटू शकतो. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे, संबंध जपणे यामध्ये

ऑऩलाइन लोकमतइस्लामपूर, दि. 16 -  सरकारात मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त मी कोणालाही भेटू शकतो. एकमेकांच्या गाठीभेटी घेणे, संबंध जपणे यामध्ये वेगळे असे काही नसते. त्यामुळे आपल्याला जर वेळ असेल आणि बोलावणे आलेच तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरची भेट होणारच, असा पलटवार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शुक्रवारी केला.इस्लामपूर येथे सावकार कॉलनीतील निवासस्थानी खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-खासदार राजू शेट्टी यांनी अमित शहा यांच्या भेटीबाबत ह्यआपल्या आदेशाशिवाय संघटनेचा प्रतिनिधी म्हणून कोणालाही भेटता येणार नाहीह्ण, असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर खोत बोलत होते.ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना खासदार शेट्टी यांनी केली आहे. ते संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मी चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करतो. खासदार शेट्टी यांनीच यापूर्वी अनेकवेळा संघटनेत अनेक कार्यकर्ते असून, त्यापैकीच सदाभाऊ एक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मला कार्यकर्ता, विद्यार्थी म्हणून आयुष्यभर रहायला आवडेल. या संघटनेत मी त्यांचे नेतृत्व मानून काम केले आहे.अमित शहा यांच्या भेटीविषयी शेट्टींकडून आपल्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. मंत्री म्हणून काम करत असताना कामानिमित्त भेटीगाठी होणे क्रमप्राप्त असते. माझ्यात कार्यकर्त्याचा गुण असल्यामुळे मानसन्मान न मागता मी भेटीगाठी घेतो. कार्यकर्त्याला लहान-मोठा असा भेदभाव नसतो. तो कार्यकर्ताच असतो, वेळ आली तर सतरंज्या उचलतो. जमिनीवर बसतो. त्याचे कुठल्या पत्रिकेत नाव असलेच पाहिजे असा आग्रह धरत नाही, असा उपरोधिक चिमटाही खासदार शेट्टी यांचे नाव न घेता खोत यांनी काढला.नेतेपण आले की मानसन्मान येतो. त्यामुळे मला कार्यकर्ता म्हणून राहण्यात स्वारस्य आहे. नेता म्हणून जगायचे नाही. सोमवारी मी मुंबईत असणार आहे. त्यामुळे मला वेळ असला की अमित शहा यांच्याबरोबरची भेट होणारच, असा पुनरुच्चारही खोत यांनी शेवटी केला.