शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन मागे

By admin | Updated: March 14, 2015 05:45 IST

कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शुक्रवारी बारावी पेपर तपासणीवरील असहकार आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीची एकच मागणी मान्य झाल्याने समितीने दहावी पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला आहे.कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची संच मान्यता व नियुक्ती तातडीने करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी द्यावी, अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाने बारावी पेपर तपासण्याचे असहकार आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी शिक्षणमंत्र्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्याने महासंघाने आपले असहकार आंदोलन मागे घेतले असल्याचे, महासंघाचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.तर शिक्षणमंत्र्यांनी शाळांची फेरतपासणी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शाळांच्या अनुदानासाठी निधीची तरतूद झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. आंदोलनाबाबत समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आम्ही भूमिका जाहीर करू, असेही रेडीज यांनी सांगितले.