शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

बेस्ट कामगार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 19:24 IST

मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत.

मुंबई, दि. 3 - मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापन दिनी बेस्ट बंद असणार आहे. ७ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने मुंबईकरांची मात्र प्रचंड गैरसोय होणार आहे.  बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने महापालिकेने मदत करून पालकत्वाची भूमिका पार पाडावी, अशी कामगारांची मागणी आहे. मात्र याबाबत पालिका प्रशासनाबरोबरच्या पाच बैठका निष्फळ ठरल्याने अखेर बेस्ट कामगारांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. वडाळा आगारात बेस्ट कामगार संघटनांचे नेते बेमुदत उपोषण तर कामगार साखळी उपोषणाला बसले होते. मात्र गेल्या तीन दिवसात पालिकेचा एकही वरिष्ठ अधिकारी तिथे फिरकला नाही. त्यामुळे कामगार हवालदिल झाले आहेत.  अखेर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेत असल्याचे बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने जाहीर केले. लोकशाही मार्गाने मदत मिळत नसल्याने आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे बेस्ट उपक्रम ७० वा वर्धापन दिन साजरा करीत असताना त्याच दिवशी बेस्ट बस गाड्या बंद असणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

संप अटळ पालिका प्रशासनाने या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चादेखील केली नाही. पालिका प्रशासनाची अशी मुजोरी सुरू असताना आंदोलनकर्त्यांची प्रकृती मात्र खालावत आहे. त्यामुळे उपोषण मागे घेऊन  ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून सर्व कर्मचार्‍यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेतला. - सुहास सामंत, ‘बेस्ट’ कामगार सेना, कृती समिती 

संपात सहभागी संघटना  बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार संघटना, भाजप बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटनांसह अनेक संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे बस सेवा पुर्णतः ठप्प असतील असा दावा बेस्ट कामगार संघटना करीत आहेत. 

अशा आहेत बेस्टच्या मागण्या - आर्थिक मदत मिळावी  - कर्जाचे व्याज दर कमी असावे - बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा- पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी- बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्‍या दिवशी करावा  बेस्ट उप्रक्रमाच्या बसगाड्यांमधून ३० लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात. तर बेस्टमार्फत कुलाबा, चर्चगेट ते सायन, माहीमपर्यंत शहर भागातील दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. बेस्ट उपक्रमाच्या डोक्यावर सुमारे २१०० कोटींचे कर्ज आहे. बेस्ट उपक्रमात ४४ हजार कामगार-अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी दरमहा १२० कोटी रुपयांची तजवीज बेस्ट प्रशासनाला करावी लागते. 

 बेस्ट उपक्रमाला वाचवण्यासाठी बचतीचा पहिला मार्ग म्हणून बेस्टने २७८ वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या. तसेच बेस्टच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र या दरवाढीस विरोध असल्याने हा प्रस्ताव अडचणीत आहे.