जयंत धुळप, आविष्कार देसाई, अलिबागमुरूड तालुक्यातील शिघे्र गावातील जगदीश मांदाडकर आणि शिरगावमधील कृष्णा सातमकर यांच्या कुटुंबाची वाळीत प्रकरणातून मुक्तता करण्यात आली आहे. रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे व अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी दोन्ही गावांत ग्रामस्थांची विशेष बैठक घेऊन सामोपचाराने ही दोन्ही प्रकरणे मिटवली आहेत.मुरूड तालुक्यातील वाळीत प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिसांना यश आले आहे. ग्रामस्थ आणि वाळीत टाकलेल्या कुटुंबांची मने जुळल्याने अन्य बहिष्कृत प्रकरणासाठी हे सकारात्मक पाऊल ठरणार आहे. शिरगावमधील कृष्णा सातमकर यांना गावकीने समाजातून बहिष्कृत केले होते. याबाबतची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्याने जिल्ह्यातील वाळीत प्रकरणे मोठ्या संख्येने पुढे येऊ लागली. अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेने सादर केलेल्या वाळीत प्रथा निर्मूलन अभियानाची नुकतीस घोषणा झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन अशा अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिरगावातील प्रकरण हाताळण्यासाठी तक्रारदार कृष्णा सातमकर आणि गावकी पंचकमिटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांच्यात चर्चा घडवून आणून वाद मिटविला. यासाठी लक्ष्मण मोरे, सहदेव सातमकर, संदीप सातमकर आणि वळके ग्रामपंचायत सदस्य किशोर काजरे शिरगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.शिघे्र गावांतील वाळीतग्रस्त जगदीश मांदाडकर कुटुंंबीय आणि गावकीचे पंच जनार्दन मांदाडकर, रामा पाटील, रामजी पाटील, अनंत पाटील, मंगेश पाटील, धोंडूराम पाटील, नरेंद्र पाटील यांच्यात संयुक्त बैठक झाली. या वेळी ही वाईट प्रथा बंद करण्यासाठी सामोपचाराची भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचा गांभीर्याने विचार करून गावकीने बहिष्कार मागे घेतल्याचे सांगितले.
दोन कुटुंबांवरील बहिष्कार मागे
By admin | Updated: December 19, 2014 05:05 IST